देशमुख कांबळे येथे शेतशिवार फेरी व शेतकरी मेळावा संपन्न…शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रश्नांचे निरसन…

0
56

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य व किसान फाउंडेशन रायगड यांच्यामार्फत बुधवार दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी महाड तालुक्यातील देशमुख कांबळे गावात शेत शिवार फेरी व शेतकरी मेळावा संघटनेचे अध्यक्ष श्री.टी.एस.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला… या कार्यक्रमास प्रमुख म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे विस्तार शास्त्रज्ञ डॉक्टर प्रमोद मांडवकर हे उपस्थित होते… प्रमुख पाहुणे म्हणून श्री.धीरज तोरणे तालुका कृषी अधिकारी महाड नामदेव कटरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते… सुरुवातीला प्रगतशील शेतकरी श्री.उमेश देशमुख यांचे शिवाराला सर्व मान्यवरांनी व शेतकऱ्यांनी भेट दिली… यावेळी त्यांनी शेतात पिकवलेल्या भुईमूग, मूग, मटकी, वाल व चवळी इत्यादी पिकांचे माहिती शेतकऱ्यांना दिली… या पिकांच्या सद्यस्थितीत पुढील व्यवस्थापन याविषयी डॉक्टर प्रमोद मांडवकर व कृषी पर्यवेक्षक श्री.कोकरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले… शेतकरी मेळ्याचे आयोजन माजी आ.श्री.चंद्रकांत देशमुख सभागृह देशमुख कांबळे येथे करण्यात आले होते… सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना वंदन व दीप प्रज्वलन करण्यात आले… उपस्थित मान्यवरांचा सत्कार व स्वागत संघटनेचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले… त्यानंतर पंचायत समितीच्या शेतीसाठीचे विविध योजनांची माहिती श्री नामदेव कटरे यांनी दिली…. कृषी विभागाच्या योजनांची माहिती कृषी प्रवेक्षक श्री कोकरे यांनी दिली… प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना डॉक्टर प्रमोद मांडवकर यांनी एकात्मिक शेती पद्धती व सामूहिक शेती विषयक माहिती दिली…. महाडच्या औद्योगिक पट्ट्यात शेतकरी मेळावा घेऊन शेतकऱ्यांना जागरूक ठेवण्याचे काम विकास क्रांती संघटना करत असल्याबद्दल त्यांनी संघटनेला धन्यवाद दिले… डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आत्मसात करावे, त्याचप्रमाणे सर्व योजनांचा लाभ घेताना रोजगार प्रमुख दृष्टिकोन ठेवली असे आवाहन केले त्यानंतर श्री धीरज तोरणे यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना फायदेशीर असून त्या सहभागी घेण्याचे आवाहन केले… किसान क्रांती संघटनेचे उपाध्यक्ष श्रीधर जंजीरकर यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा सादर केला व शेतकऱ्यांनी संघटनेत सहभागी होणे विषयी माहिती दिली… अध्यक्ष मार्गदर्शन करताना शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर व जिल्ह्यात विविध कार्यक्रम, शेतकरी सत्कार सोहळा कार्यावर विविध शासकीय संस्था यांच्या सहकार्याने सुरू असल्याचे नमूद केले… शेतकरी आत्मनिर्भर झाला पाहिजे यासाठी कष्ट करण्याचे आव्हान उपस्थित शेतकऱ्यांना दिले… कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव राजेंद्र जयैपाल यांनी केले व या कार्यक्रमात देशमुख आमले परिसरातील 250 शेतकरी सहभागी झाले होते…