रत्नागिरी शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
नवीन जिल्ह्यांची निर्मिती ही महाराष्ट्राच्या प्रशासकीय सुधारणा व विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.यामुळे स्थानिक स्वराज संस्था आणखी मजबूत होतील, तसेच नागरी सुविधांमध्ये वाढ होईल. यामुळे येत्या काही वर्षांत राज्याच्या विकासाला गती मिळेल, असा सरकारचा कयास आणि विश्वास आहे.या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी प्रचंड आर्थिक गुंतवणूक व प्रशासनीक पुनर्रचना आवश्यक आहे.नवीन जिल्ह्यांचे मुख्यालय, प्रशासकीय कार्यालये, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याच्या प्रशासकीय गरजांनुसार नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
नवीन जिल्ह्यांमुळे प्रशासन अधिक सुलभ आणि कार्यक्षम होईल. प्रत्येक जिल्ह्याचे क्षेत्रफळ (आकार) कमी झाल्याने स्थानिक पातळीवर समस्या सोडविण्यासाठी यांचा चांगला उपयोग होईल तत्परता साधणे शक्य होईल. रोजगार निर्मिती, शिक्षण आणि आरोग्य सुविधांमध्ये मोठी सुधारणा होईल. नागरिकांच्या समस्या अधिक जलद गतीने सोडविल्या जातील.रत्नागिरी जिल्ह्यातील “मंडणगड” हे नवीन जिल्ह्यांपैकी एक असणार आहे, ज्याची निर्मिती राज्याच्या प्रशासकीय सुधारणा आणि विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.मंडणगड या नवीन जिल्ह्याच्या निर्मितीमुळे प्रशासन अधिक चपळ आणि कार्यक्षम होईल. तसेच स्थानिक पातळीवर विकास गतिमान होईल.आपण स्वातंत्र्याची ७५वी वर्षगाठ साजरी केली, पण भारताचे संविधान ज्यांनी लिहिले त्या स्व. प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगांव “आंबवडे रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या “मंडणगड तालुक्यात आहे तो मंडणगड तालुका मात्र विकासापासून अजूनही वंचितच राहिलेला आहे.आता शासनाच्या या निर्णयामुळे “आंबवडे ” हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगांव महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे दिसून येईल.नवीन जिल्ह्यांमध्ये भुसावळ (जळगाव), आंबेजोगाई (बीड), मालेगाव आणि कळवण (नाशिक),आणि (नांदेड), मीरा-भाईंदर, आणि कल्याण (ठाणे) यांचा समावेश आहे. सन् २०१८ मध्ये मुख्य सचिवांच्या समितीने २१ नवीन जिल्हे आणि ४९ नवीन तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. ज्याची अंमलबजावणी सध्याच्या सरकारने सुरू केली आहे.महाराष्ट्रात २६ जानेवारी २०२५ रोजी २१ नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार आहे. सध्याच्या ३५ जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार केले जाणार आहेत. उदगीर जिल्हा, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील काही भाग एकत्र करून निर्माण केला जाणार आहे, जो लोकसंख्या निहाय महत्वपूर्ण व योग्य निर्णय ठरणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प अंमलबजावणीस येणार आहे.यापैकी अग्रक्रमाने सध्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील “मंडणगड” हे नवीन जिल्ह्यांपैकी एक मानबिंदू असेल.