नवी मुंबईच्या खारघर परिसरात दिसला सोनेरी कोल्हा..वन्यप्राणी रहाटीवरील मानवी आक्रमणांचा प्रताप…

0
50

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-

पशुप्रेमी असलेल्या प्रदीप चौधरी यांनी अलिकडेच खारघर मधील निवासी वसाहतींच्या दिशेने जाणाऱ्या सोनेरी कोल्ह्याचे छायाचित्र (फोटो) काढले… भटक्या कुत्र्यांचे हल्ले, घाबरलेल्या रहिवाशांकडून दगडफेक आणि भरधाव वेगातील वाहनांच्या धडकेच्या जोखमीसह या प्राण्यांना भेडसावणाऱ्या धोक्याबाबत देखील… त्यांनी  प्रसारमाध्यमांशी चिंता व्यक्त केली आहे.दरम्यान प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अलिकडच्या काही काळात या सोनेरी कोल्ह्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबद्दल धोक्याची घंटा वाजली आहे. खारघर वेटलॅंड्स एण्ड हिल्स फोरमच्या नेत्या ज्योती नाडकर्णी टीओआयसी बोलताना म्हणाल्या “सागरी हरीत आच्छादन आणि पाणथळ जागा” यांच्या पद्धतशीर नावामुळे हे संघर्ष उद्भवतात.या आधी वासाच्या संवर्धनासाठी त्वरीत कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले आणि विलंबामुळे अपरिवर्तनीय नुकसान होऊ शकते असा इशारा देखील त्यांनी दिला.समुद्र किनारपट्टीलगत खारफुटी, खाड्या आणि पर्वतांनी वेढलेल्या नवीन मुंबईच्या खारघरमधील नयनरम्य अशा निवासी भागात हे सोनेरी कोल्हे आढळून येतात. दिवसेंदिवस सोनेरी कोल्ह्याची संख्या आणि ते दिसण्याचे प्रमाण अधिकाधिक वाढू लागले आहे. त्यामुळे पर्यावरणवादी आणि प्राणीप्रेमी धोक्याचा इशारा देत आहेत. अशाप्रकारे या वन्य प्राण्यांचे लोकवस्तीत दिसणे हे चिंताजनक आहे. वन्य प्राण्यांना प्रिय नैसर्गिक अधिवास असलेल्या खारफुटी आणि पाणथळ जागा संपुष्टात येत आहेत. त्यांचा मानवी हस्तक्षेपामुळे नाश होत आहे.मात्र अशा प्रजाती आता हळूहळू संपुष्टात येत आहेत. मानवी हस्तक्षेपामुळे  त्यांच्या हक्काच्या नैसर्गिक वातावरणाचा मानवी हस्तक्षेपामुळे विशेषतः शहरी बलाढ्य बिल्डर लॉबीमुळे नाश होत असल्यानेच त्यांना लोकवस्तीत शिरकाव करावा लागतो. मानवी वस्तीत अन्न आणि निवारा घेण्यास त्यांना भाग पडत आहे. वन्य प्राण्यांच्या नागरी वस्तीतील प्रवेशास हे प्राणी नव्हे तर मनुष्यप्राणीच कारणीभूत असल्याचे तज्ज्ञमंडळींचे मत आहे.