स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर होणार… कर्जत-खालापूर निवडूकीत घड्याळाची टिक टिक ऐकायला मिळणार का ?

0
38

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कर्जत खालापूर मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने मतदारसंघातील जवळपास सर्वच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. आणि परिवर्तन आघाडी स्थापन करून विधानसभा अपक्ष लढवली. आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर होतील. खोपोलीसह कर्जत खालापुरात या निवडूकीत घड्याळाची टिक टिक ऐकाला मिळणार की परिवर्तन आघाडीच असेल अशा चर्चा सध्या ऐकायला मिळत आहेत. कर्जत खालापूर मतदारसंघात जेवढी ताकद शिवसेना पक्षाची आहे तेवढीच ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आहे. त्यामुळे आजपर्यंत ग्रामपांचायत असो किंवा लोकसभा असो, या मतदारसंघात धनुष्यबाणाबरोबर राष्ट्रवादीच्या घडाळ्याचा बोलाबाला पहावायास मिळाला आहे. आणि हे दोन्ही पक्ष आज पर्यंत एकमेकांचे मुख्य प्रतिस्पर्धी होते. पण महायुतीत अजित पवार दाखल झाल्यानंतर, कर्जत खालापूर मतदारसंघात विधानसभेसाठी मोठा संघर्ष निर्माण झाला… विद्यमान आमदार, शिवसेनेचे महेंद्र थोरवे असतानाही राष्ट्रवादीचे सुधाकर घारे हे विधानसभा लढवण्यास इच्छुक होते. व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा वरदहस्त सुधाकर घारे यांच्यावर असल्याने आपल्याला महायुतीचे तिकीट मिळेल असा त्यांना विश्वास होता. पण महायुतीतर्फे शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर मतदार संघातील राष्ट्रवादीचे तमाम पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक झाली. व सर्वांनी हाती घातलेले घड्याळ सोडून अपक्ष निवडणूक लढवण्याचे ठरवले. आणि इतर अनेक पक्षांना बरोबर घेऊन परिवर्तन आघाडी स्थापन केली. व निवडणूक लढवली पण त्यात सुधाकर घारे यांचा थोड्या मतांनी पराभव झाला व शिवसेनेचे महेंद्र थोरवे दुसऱ्यांदा निवडून आले.या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचा राजिनामा दिलेले सर्व पदाधिकारी पुन्हा राष्ट्रवादीत येतील असे वाटले होते. पण अद्याप तसे झाले नाही. आणि लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. जिल्हापरिषद, पंचायात समिती, नगरपालिका यांच्या निवडणूकीचा हंगाम आता सुरु होणार आहे. त्यामुळे राष्ट्रावादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पहावायास मिळत आहे. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका राष्ट्रवादीच्या घड्याळावर लढवायच्या की परिवर्तन आघाडीतर्फे, याचे मार्गदर्शन सध्या कोणत्याचं नेत्याकडून होत नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.