राजाभाऊ ठाकूर यांनी मागणी केलेल्या EVM बॅलट पेपर निवडणूकिचा सूर अनेक ठिकाणी… 

0
56

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील)  :-

गेल्या वर्षी दि. 09 डिसेंबर 2024 रोजी EVM आंदोलन विरोधात राजा भाऊ ठाकूर यांनी माणगावात सभा दरम्यान डिजिटल स्क्रीन लाईव्हद्वारे राजा भाऊ ठाकूर यांनी निवडणूक पारदर्शक तसेच मतदार यांना विश्वास होईल असे नवीन निवडणूक प्रात्यक्षिक ईव्हिएम मशीन सोबत जोडलेला VVPAT ची स्लिप थेट मतदार यांच्या हातात देवून आणि मतदार यांनी ती खात्री करून बॅलेट बॉक्समध्ये टाकून आपले मत योग्य प्रकाराचे झाल्याचे आत्मविश्वास होणारा व खात्रीलायक नवीन पद्धत संकल्पना मांडली होती आणि याबाबत मीडिया क्षेत्रात मोठा चर्चेचा विषय बनला होता…  सोबत राजा भाऊ ठाकूर यांनी माणगाव उपविभागिय अधिकारी यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती महिम, मुख्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना EVM मशीन विरोधात तसेच सदर पद्धत हटवून मी मांडलेला पद्धत जसे VVPAT स्लिप थेट मतदार यांच्या हातात मिळावे आणि मतदाता स्वतः व्हेरिफाय करून मत पेटीत अर्थातच बॅलेट बॉक्स मध्ये ठाकून सुरक्षित तसेच पारदर्शक होईल आणि हीच पद्धत अनुसरून पुढील सर्व निवडणूक घेण्यात यावी म्हणून आपल्या अर्जामध्ये उल्लेख करून निवेदन सादर केले होते…. दरम्यान राजाभाऊ ठाकूर यांनी माणगाव नगरीत मांडलेली ही नवीन संकल्पना आणि EVM विरोधात लढाई देणारे राजा भाऊ ठाकूर हे पहिलेच राजकीय नेते बनले… दरम्यान ठीक ठिकाणी आता EVM विरोधात ही लढाई तीव्र होताना दिसत असताना राजा भाऊ ठाकूर यांनी मांडलेल्या पारदर्शक निवडणूक पद्धत बाबतही अनेक राजकीय नेत्यांनी विविध ठिकाणी पार पडत असलेल्या आंदोलनात उचलून धरले आहे… त्यामुळे एक बाब स्पष्ट झाली आहे की, राजा भाऊ ठाकूर नवीन निवडणूक पद्धतीचे ते जनक बनले आहेत… त्याचबरोबर माणगाव शहराचे नाव हे देशाच्या काना कोपऱ्यात राजा भाऊ यांनी कोरले आहे… दरम्यान आता निवडणूक आयोग तसेच सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार हे पाहण्यास उत्सुकता बनली आहे… दरम्यानाच्या  काळात संपूर्ण देशात काँग्रेस पक्ष खा.राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली EVM विरोधात जनआंदोलन उपक्रम हाती घेण्यात यावी आणि भारत जोडो आंदोलन सारखाच त्याला स्वरूप देण्यात यावे  म्हणुन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांनी आव्हान केले आहे… तसेच बेळगाव येथील काँग्रेस पक्षाचे जे अधिवेशन भरले त्यात या EVM मशीन विरोधात आंदोलनाचा ठराव संमती करून घेण्यात यावा असेही अनेक काँग्रेस नेते यांनी आग्रह धरला होता… दरम्यान राज्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना भाऊ पटोळे यांनी काही दिवसापूर्वी पुणे येथे EVM मशीन विरोधात जे आंदोलन झाले त्यावेळी नाना भाऊ यांनी राजा भाऊ ठाकूर माणगावात जबरदस्त आंदोलन केल्याचे खास बाब उल्लेख करून निदर्शनास आणून दिली… तसेच काल परवा उत्तम जाणकर यांनी EVM घोटाळा बाबत बोलताना सांगितले की, EVM सोबत जी VVPAT जोडले आहे त्यातून जी स्लिप येते ती मतदार यांच्या हाती मिळावी आणि मतदाता यांनी ती हाती आलेल्या VVPAT स्लिप व्यवस्थित मत गेल्याचे खात्री करून मतपेटीत  टाकतील… तर अशी पद्धत वापरल्यास निवडणुकीत घोटाळा हा मुद्दाच रहणार नाही आणि निवडणूक पारदर्शकता  मिळेल… राजा भाऊ ठाकूर यांनी मांडलेल्या निवडणूक पारदर्शकतेच्या संकल्पना आत्ता सगळीकडे ती आचरणात  आणावी …

दरम्यान राजा भाऊ ठाकूर हे काँग्रेस पक्षाचे माजी लोकप्रिय आमदार दिवंगत मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र आहे…  वडील मधुकर ठाकूर प्रमाणे राजा भाऊही नामांकित व्यक्तीमत्वमुळे लोक त्यांना प्रेमाने “राजा भाऊ” हे बिरुद देवून हाक मारत आहे… त्यांचे खरे नाव आहे राजेंद्र मधुकर ठाकूर होय ! राजा भाऊ हे 193 श्रीवर्धन विधानसभा 2024 सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लढले होते… मात्र EVM घोटाळा आणि हेरा फेरी झाली त्यामुळे त्यांचा पराभव झाल्याची  खात्री त्यांना झाल्यामुळे त्या विरोधात निवडणुकीच्या दिवशीच राजा भाऊ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केले… तसेच रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात दुसरा अर्ज तीन दिवसांनी देऊन आपण EVM मशीनमध्ये जो घोटाळा झाला त्या विरोधात तसेच EVM मशीन पुढील निवडणुकीत हद्द पार करुन EVM सोबत जोडलेला VVPAT मधून निघणारा मतदान झालेल्या उमेदवाराचे स्लिप पेपर मतदार यांच्या हातात देण्यात यावी तसेच सदर स्लिप बॅलट बॉक्समध्ये ठाकण्यासाठी नवीन पद्धतीचा वापर करावा, म्हणुन माणगाव उपविभागिय अधिकारी यांना दि. 04 डिसेंबर, 2024 रोजी तिसरा अर्ज सादर करुन आपल्याला एक खोली 30 बाय 40 चौरस मीटर उपलब्ध करुन नवीन निवडणूक प्रक्रियाचे प्रात्याक्षिक दाखविण्यासाठी उपलब्ध करून घ्यावी म्हणुन अर्जात खास उल्लेख केलेला  पाहायला मिळाला… मात्र शासन दरबारी या विनंतीकडे दुर्लक्ष केल्याने त्याची प्रात्यक्षिक माणगावात जाहीर सभेत दि. 09 डिसेंबर, 2024 रोजी मोठा स्क्रीन पडद्यामध्ये जमलेल्या विराट जनसमुदायाला दाखवून आणि या पद्धत अनुकरण करावे म्हणुन देशाचे राष्ट्रपती, केंद्रीय मुख्य निवडणूक अधिकारी आणि सर्वोच्च न्यायलायाचे मुख्य न्यायाधीश यांच्याकडे निवेदनाद्वारे सादर केले होते…  तसेच मोठ्या पडद्यामध्ये खुले आम निवडणूकीची पारदर्शक पद्धत पाहून उपस्थित जनसमुदायाला राजा भाऊ ठाकूर यांनी दाखविलेल्या पद्धतीचे स्वागत करुन जोरदार पाठिंबा दिल्याचे दिसून आले  आहे… या दरम्यान राजा भाऊ ठाकूर यांनी अनेक विरोधी पक्ष प्रमुख नेते यांनाही  “EVM” मशीन बरोबर व्हिव्हीपॅट मधून येणारा पेपर स्लिप मतदार यांच्या हाती देऊन त्यावर मतदार आपली सही करुन सदर स्लिप बॅलेट बॉक्समध्ये टाकण्याच्या नवीन संकल्पनेची प्रत पाठविली होती… तर यावर अनेक विरोधीपक्ष यांनी दखल घेऊन मागणी करीत असल्याचेही पाहायला मिळत आहे…  याचे जिवंत उदहारण म्हणजे एका विरोधी पक्षातील निवडून आलेल्या आमदार राजीनामा देणार तसेच निवडणूक आयोग यांच्याकडे विनंती करणार आहे की, जिथे पोटनिवडणूक  होईल त्याठिकाणी आपण ‘ईव्हीयम’ ऐवजी ‘बॅलेट पेपर’ वर घेण्यात यावी तसेच राजा भाऊ ठाकूर यांनी मांडलेल्या पद्धतीची प्रमाणाची मागणी करणार असल्याने यावर शिक्का मोर्तब झाला की राजा भाऊ यांनी मांडलेल्या मागणी जोर धरू लागली आहे….