मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे ) :-
एकोणीस वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट ब्रिगेडने टी-२० विश्वचषक सामन्यात विजयी सलामी देत मोहिमेला दणक्यात सुरुवात केलेली आहे.टीम इंडियाने ९ विकेट्सने वेस्ट इंडिज संघाचा धुव्वा उडवला. वेस्ट इंडिजने विजयासाठी भारताला दिलेले आव्हान अवघ्या २६ चेंडूत गाठून विजयाचा झेंडा रोवला.एकोणीस वर्षांखालील टी-२० विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आक्रमक भारतीय गोलंदाजांचा सामना करताना वेस्ट इंडीज संघ संपूर्ण २० षटकंही खेळू शकला नाही. वेस्ट इंडिजचा संघ १३.२ षटकात मात्र ४४ धावा करत ऑल आऊट झाला. ही त्यांची क्रिकेट मधील ऐतिहासिक निचांक धावसंख्या होती.अशाप्रकारे भारतीय संघाला विजयासाठी अवघे ४५ धावांचे लक्ष मिळाले होते, जे टीम इंडियाचा महिला फ्रन्टने केला आपल्या एका मोहऱ्याच्या बदल्यात ४.२ षटकातच विजयश्री खेचून आणली.कमलिनी आणि सानीका यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची नाबाद खेळी करून टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.भारताच्या विजयात जोशिथाला सामनावीर घोषित करण्यात आले.