कांदलवनाची बेकायदेशीर कत्तल करून रॉयल्टी बुडविणाऱ्याना महसूल विभागाचा अभय… रॉयल्टी बुडवून होणाऱ्या भरावाकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ?

0
42

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

रायगडच्या मुरुड तालुक्यातील बोर्ली कोलमांडले गावात काही भूमाफियांनी 7 एकर कांदळवन असलेल्या जमिनीवर अनधिकृत भराव केल्याने येथील जैवविविधता धोक्यात आली आहे. इतकंच काय तर भविष्यात संपूर्ण गावच पाण्याखाली बुडणार असल्याची भीती गावकऱ्यांना सतावत आहे. या प्रकारानंतर स्थानिकांनी अनधिकृत भराव करणाऱ्या भुमाफियां विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. अनधिकृत भरावामुळे गावच्या कांदळवन प्रजातीची  हजारो झाड या मातीत गाडली गेल्याने वनविभागाने देखील या भागाची पाहणी केली आहे. बॉम्बय पर्यावरण एक्षण ग्रुप कडून कांदळवन सुरक्षा ॲप कडे यासंदर्भात तक्रार केली होती.त्यानतंर जिल्हयातील प्रशासन खडबडून जाग झालं आहे.प्रांत विभागाने या भागाची पाहणी करून पुढील कारवाई करणार असल्याचं आश्वासन गावकऱ्यांना दिले आहे…