रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रोहा शिंदे गटातील आमदारांच्या सततच्या टिकेनंतर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी जशास तसे उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकरे कुटुंबावर होत असलेल्या आरोपांना कडाडून प्रतिवाद केला आहे.ते कितीही खालच्या पातळीवर गेले तरी आम्ही आमची पातळी सोडणार नाही, असे ठाम वक्तव्य त्यांनी केले… शिंदे गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादीवर आणि सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टिकेचा समाचार घेत अनिकेत तटकरे म्हणाले, “सुनील तटकरे हे रायगडचे खरे बादशाह आहेत. आमच्यावर टीका करून पदव्या देण्यापेक्षा त्यांची रायगडमधील ओळख आणि स्थानच खरी पदवी आहे. अनिकेत तटकरे यांनी महेंद्र थोरवे यांच्यावर निशाणा साधत म्हटले, “थोरवे हे स्वतःच अपयश झाकण्यासाठी इतरांवर बोट दाखवत आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमच्याकडे आशीर्वाद मागण्यासाठी येणाऱ्या वेळा मोजाव्यात. तेच दूध का दूध आणि पाणी का पाणी करणारे आहे.भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांच्या विधानांना उत्तर देत तटकरे यांनी सांगितले की, “पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात येऊन गोगावले यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. त्यांचे चॅलेंज आम्ही स्वीकारतो. सत्य समोर येण्याची वेळ आली आहे. तटकरे यांनी शिंदे गटातील तीनही आमदारांवर आरोप करत म्हटले, “आता हे आमदार फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आमच्यावर खोटे आरोप करत आहेत. मात्र, आमचा प्रामाणिक राजकारणाचा प्रवास कुणीही अडवू शकत नाही.अनिकेत तटकरे यांनी गोगावले आणि दळवी यांना टोला लगावत म्हटले, “महाड आणि अलिबाग मतदारसंघातील त्यांच्या प्रचारात आम्ही झोकून काम केले. मात्र आता तेच आम्हाला दूषणे देत आहेत.आमच्यावर टीका करणे काही नवीन नाही. मात्र, त्यांचा सुसंस्कृतपणा त्यांच्या वाणीतून दिसतो,” असे म्हणत त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार निशाणा साधला.तटकरे यांनी शेवटी ठामपणे सांगितले की, “आम्ही शांत आहोत म्हणजे दुर्बळ नाही. वेळ आल्यावर जशास तसे उत्तर देऊ…