७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन चौक परिसरात उत्सवात साजरा… 

0
71

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-  

७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन चौक परिसरातील विवीध शासकीय कार्यालये, ग्रामपंचायत,शाळा,कनिष्ठ महाविद्यालय, पोलीस ठाणे,शासकिय दवाखाने,अमृत महोत्सवी तलाव व शासनाच्या अंगभुत कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि देशप्रेमाने साजरा करण्यात आला… राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यास १९४६ मध्ये सुरुवात झाली, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ते मंजूर झाले, परंतु २६ जानेवारी १९५० पासून ते अंमलात आले… भारतीय राज्यघटनेने समान हक्क,स्वातंत्र्य,धार्मिक आचरण,शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्कांसह ६ मूलभूत अधिकारांची हमी भारत वासियांना देण्यात आली… २६ जानेवारी १९५० पासून भारतात कायद्याचे राज्य सुरू झाले… प्रजेची सत्ता सुरू झाली म्हणजेच भारत २६ जानेवारी १९४९ ला प्रजासत्ताक झाला… भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले…यावेळी सरपंच, शासकिय अधिकारी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले… यावेळी एकात्मतेची शपथ व बाल विवाह रोखण्याची शपथ घेण्यात आली… अनेक ग्राम पंचायत मधून माझी वसुंधरा अभियान यशस्वी करण्यासाठी शपथ घेतली… प्रत्येक गावात प्रभात फेरी काढून देश प्रेमाचा जागर करूंन एकात्मतेच्या,स्वच्छता अभियान,वृक्षारोपण,पाणी अडवा पाणी जिरवा,माझी वसुंधरा ५.० अभियानात सहभागी होण्याच्या घोषणा देण्यात आल्या… कार्यक्रमा प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला… यावेळी सरपंच, ग्राम पंचायत सदस्य,लष्करी सेवा निवृत्त अधिकारी,ग्राम पंचायत अधिकारी,ग्रामस्थ,शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…