पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
बर्ड फ्ल्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला आहे… जिल्हा प्रशासनाकडूनही उपाययोजना करण्यात येत आहे… उकडलेली अंडी, चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे… तसेच बर्ड फ्ल्यूबाबत कोणीही अफवा पसरवू नये, असे आवाहन महाराष्ट्र पोल्ट्री योध्दा अध्यक्ष अनिल खामकरयांनी केले आहे…. चिरनेर येथील मृत पक्ष्यांचे नमुने बर्ड फ्ल्यू एच ५ एन १ चे आढळल्याचे राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग मार्गदर्शक सूचना जारी बर्ड फ्ल्यूची तीव्रता व गंभीरता लक्षात घेऊन राज्यातील सर्व जिल्ह्यांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावर दिल्या आहेत… तसेच रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून खबरदारीच्या उपायांबाबत पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शक सूचना परिपत्रक जारी केले आहे…
संस्थानकडून कळवण्यात आले आहे, त्या अनुषंगाने, केंद्र सरकारच्या रोगप्रादुर्भाव प्रतिबंध व नियंत्रण राष्ट्रीय कृती आराखड्यानुसार, बाधित केंद्रापासून एक किलोमीटर परिसर बाधित म्हणून घोषित करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत… तसेच बाधित क्षेत्रातील १,२३७ पक्षी, १७७ अंडी व २७० किलो खाद्य, ५० किलो तुस व १० रिकाम्या गोणी नष्ट केल्या आहेत… या करिता संबंधित कुक्कुटपालकांना नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे…
उकडलेली अंडी, चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे… त्यामुळे अंडी व चिकन शिजवून खाण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे… तसेच कोठेही पक्ष्यांमध्ये मरतुक असल्यास तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये माहिती द्यावी… तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८/१९६२ वर माहिती द्यावी…. बर्ड फ्ल्यूबाबत गैरसमज व अफवा पसरवू नये असे डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी म्हटले आहे…