पाच वर्षांत एमएसआरटीसी कडे येणार नवीन २५,००० बसेस… अर्थमंत्री अजित पवार यांची मान्यता…

0
34

मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा प्रती वर्षी ५००० याप्रमाणे पाच वर्षांत नवीन २५,००० नवीन लालपरी बस गाड्या घेण्याच्या मानस असून प्रस्तुत प्रस्तावाला उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजीतदादा पवार यांनी तत्वतः  मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्यास राज्य  परिवहन महामंडळा सूचना दिल्या आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.सन् २०२४-२५च्या अर्थसंकल्पासाठी  परिवहन विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी बोलावली होती. यावेळी राज्य परिवहन महामंडळाची सद्यस्थिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विषद केली.सध्या एसटी महामंडळाकडे १४,३०० बसेस आहेत त्यापैकी १० वर्षांहून अधिक जुन्या झालेल्या बसेस आहेत आणि त्या येत्या ३ ते ४ वर्षांत सेवेतून बाद होतील. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, भविष्यात एसटी महामंडळास आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतःच्या बस घेणे आवश्यक आहे.त्यानुसार येत्या पाच वर्षांत प्रती वर्षी पाच हजार याप्रमाणे पाच वर्षांत एकूण पंचवीस हजार नवीन लालपरी बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना आखण्यात आली आहे असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. राज्य परिवहन महामंडळाची निकड लक्षात घेता तातडीने अर्थमंत्र्यांनी या योजनेस तत्वतः मान्यता दिली आहे, याबद्दल परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांचे आभार मानले आहेत.परिवहनमंत्री पुढे म्हणाले की येत्या पाच वर्षांत म्हणजे २०२९ साली या एकूण २५,००० बसेस आणि नव्याने येणाऱ्या ५,००० इलेक्ट्रीक बसेस मिळून राज्य परिवहन महामंडळाकडे तेव्हा एकूण ३०,००० बसचा ताफा असणार आहे.म्हणजे भविष्यात “गांव तेथे एस.टी.” आणि “मागेल त्याला बस फेरी” आपण देऊ शकतो.