अपघात टाळण्यासाठी मिळणारे ज्ञान महत्त्वाचे… ज्ञान आत्मसात केल्यास परिवार सुरक्षित राहतो:सुरेश मेकला…

0
36

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-       

अपघात टाळण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातुन मिळणारे ज्ञान अतिशय महत्त्वाचे आहे, हे आत्मसात केल्यास व त्या अनुषंगाने रस्त्यावर मार्गक्रमण केल्यास परिवार व त्यावर अवलंबून असणारे सुरक्षित राहतात, असे आवाहन अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य सुरेश कुमार मेकला यांनी केले…पोलीस अधिक्षक महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अभियान राबविण्यात आले आहे… यावेळी महामार्गावरील अपघात घटनांच्या ठिकाणी स्वयंस्पूर्तीने सहभागी होऊन आपत्कालीन प्रसंगी आणि रस्ते अपघातातील जखमींना सातत्याने मदतकार्य करणाऱ्या संस्था, सामजिक कार्यकर्ते, पत्रकार, लोक प्रतिनिधी, विद्यार्थी पोलीस यांचा सत्कार डॉ.सुरेश कुमार मेकला यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते…ते पुढे म्हणाले कि, हे अभियान जानेवारी महिन्या पुरते न रहाता वर्षाच्या बारा महिने असणे गरजेचे आहे…

यावेळी अपघातात कशा प्रकारे मदत करण्यात येते, ही मदत आम्ही का करतो? याची माहिती देऊन समाजातील प्रत्येक घटकाची सुरक्षा ही जबाबदारी असल्याचे अपघातग्रस्तांना मदत सामजिक संस्था व हेल्प फाऊंडेशनचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर यांनी दिली… सारथी  सुरक्षा सेवा संस्था मुंबई संस्थेचे अध्यक्ष विनय मोरे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि मदत करणाऱ्या संस्था यांना सिग्नल आणि आपली सुरक्षा कशी करावी हे प्रात्यक्षिकसह मार्गदर्शन करताना मेंदू सतत सतर्क ठेवा, असे आवाहन केले… कार्यक्रमाचे प्रास्तविक पोलीस अधिक्षक महामार्ग सुरक्षा पथक रायगडचे तानाजी चिखले यांनी केले… यावेळी अपघातग्रस्तांना मदतीसाठी सामाजिक संस्था खोपोली, पेट्रोलिंग डेल्टा टीम, अग्नीशमन दल, आरोग्य विभाग, रुग्ण वाहिका चालक, आई.आर.बी.इन्फ्रा.विद्यार्थी, पोलीस, पोलीस अधिकारी, पत्रकार, सामजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला…रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले…  क्रिकेट स्पर्धा विजेते बोरघाट आणि पळस्पे या टीमचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले… पळस्पा युनिटचे पोऊनी… देविदास नाईक, पोह. रमेश देवकर व विजय भगत यांनाही विशेष कामगिरी म्हणून गौरविण्यात आले… कार्यक्रमाला पोलीस उपअधीक्षक ज्योत्स्ना रासम, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक विनोद माळवे, प्रभारी अधिकारी वैभव रोंगे यांच्यासह वाहतूक पोलिस, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते… यावेळी आभार प्रदर्शन ज्योत्स्ना रासम यांनी केले…