एकोणीस वर्षांखालील भारतीय महिला टी-२० संघ विश्वविजेता… कौलालंपूर येथील विजयासह पटकावले सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद…

0
43

मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):- 

मलेशिया मध्ये कौलालंपूर येथे खेळवण्यात आलेल्या एकोणीस वर्षां खालील महिला टी-२० क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी-२०२५ च्या फायनलमध्ये भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेवर ९ गडी राखून दैदिप्यमान विजय मिळवला आहे… रविवार दि.२ फेब्रुवारी रोजी येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात त्रिशाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे…. अष्टपैलू त्रिशाने या स्पर्धेत ३०९ धावांसह ७ विकेट्स घेत आपल्या खेळाची चुणूक दाखवलेली आहे…
प्रशिक्षक नूशीर अल खदीर यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने २०२३ ला  पहिल्यांदा विश्वचषकाला गवसणी घातली होती, तर २०२५ च्या या स्पर्धेच्या यशात देखील प्रशिक्षक नूशीर यांचेच मोलाचे मार्गदर्शन भारतीय संघाला लाभलेले आहे… सोशल मीडियावर बोलताना भारतीय महिला संघाचे कौतुक करत बीसीसीआयने ५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे… संघातील सर्व १५ खेळाडूंसहीत मुख्य प्रशिक्षक नूशीर अल खदीर आणि स्टाफ मधील इतर सदस्यांमध्ये हे बक्षीस  वितरीत केले जाईल….
अंडर-१९ भारतीय महिला संघाने आयसीसी वूमेंस वनडे क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर विजेत्या संघास ट्रॉफी व सर्वांना मेडल्स दिली पण कोणासही रोख बक्षिस दिले नाही,  याचे कारण असे की, १९ वर्षांखालील स्तरावरील विश्वचषक स्पर्धेत विजेत्या संघाला आयसीसी बक्षीसांची रोख रक्कम देत नाही आणि हा नियम पुरुषांच्या अंडर-१९ विश्वचषकासाठी देखील लागू आहे…. यापूर्वी २०२३ मध्ये विजेतेपद पटकावलेल्या भारतीय अंडर-१९ महिला संघास देखील कोणतेही रोख बक्षिस देण्यात आले नव्हते आणि हा आयसीसी बोर्डाचा नियमच आहे आणि तेव्हा देखील संघाच्या उत्तेजनार्थ बीसीसीआयनेच पाच कोटी रुपये विजयी भारतीय महिला संघाला दिले होते…. यावेळी देखील भारतीय संघाने अंतिम सामन्यात एकतर्फी विजय मिळवला…. दक्षिण आफ्रिकाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण भारतीय महिला गोलंदाजांपुढे दक्षिण आफ्रिकन फलंदाज निष्प्रभ दिसून आले…. भारतीय फिरकी आक्रमणासमोर आफ्रिकेच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली… दक्षिण आफ्रिका संघ २० षटकात अवघ्या ८२ धावांत ऑल आऊट झाला….
भारतातर्फे त्रिशाने सर्वाधिक तिन विकेट्स घेतल्या…. गोलंदाजीतील चमकदार कामगिरी नंतर  त्रिशाने फलंदाजीतही चमकदार नाबाद ४४ धावा जलदगतीने तडकवल्या‌ आणि भारताला मोठा विजय मिळवून देण्यासाठी मोठा हातभार लावला…. भारताने १२ षटकात ९ गडी राखून विजय मिळवला…. संपूर्ण स्पर्धेत ३०९ धावा आणि ७ विकेट्स  अशा उत्कृष्ट कामगिरीसाठी त्रिशाला सामनावीर तसेच टूर्नामेंटची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले…. स्पर्धेत ३०९ धावा आणि ७ विकेट्स घेणारी अष्टपैलू त्रिशा‌ ठरली सामनावीर व बेस्ट ऑफ ली टूर्नामेंटविश्वविजेत्या संघास ट्रॉफी आणि मेडल्स देण्यात आले पण नियमानुसार रोख बक्षिसे देण्यात आलेली नाहीत…