रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार) :-
पाताळगंगा एमआयडीसी ब्रिजच्या खाली पाताळगंगा नदी पात्रात ४१ वर्षीय तरुण दारूच्या नशेत पडून मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे… ४१ वर्षीय तरुण पाताळगंगा एमआयडीसी ब्रिजच्या खाली पाताळगंगा नदी पात्रात पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच रसायनी पोलिस घटनास्थळी दाखल झाले व तात्काळ त्या तरुणाला चौक ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत असल्याचे घोषित केले…
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नवीन पोसरी मोहोपाडा येथील सागर म्हात्रे यांच्या चाळीत राहणारा वालु नीलू चव्हाण (४१) याला दारूचे व्यसन होते व दारूच्या नशेतच तो पाताळगंगा एमआयडीसी ब्रिजच्या खाली पाताळगंगा नदी पात्रात पडून झालेल्या दुखापतीमुळेच मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे… सदर घटना दि.३ फेब्रुवारी रात्री ९:३० ते ४ फेब्रुवारी सकाळी ७:३० च्या दरम्यान (नक्की वेळ माहित नाही) घडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे… सदर घटनेची खबर मयत वालुचा भाऊ विशाल बालु चव्हाण याने रसायनी पोलीस ठाण्यात दिली असून, रसायनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि.नं.०७/२०२५ बी.एन.एस.एस.१९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे… अधिक तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री.पानपट्टे हे करीत आहेत…