मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
मुंबईतील मुलुंड येथील संभाजी सांस्कृतिक सभागृहात शनिवार दि.८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ०४.०० वाजता कोंकण विकास समितीची विशेष सर्वसाधारण सभा समितीचे संस्थापक – अध्यक्ष श्री. जयवंतराव दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेस विविध क्षेत्रातील कोंकणस्थ मान्यवरांची प्रकर्षाने उपस्थिती होती.प्रास्ताविकानंतर समितीचे मा. अध्यक्ष श्री. जयवंतराव दरेकर प्रस्तुत सभेच्या आयोजनाचा आशय मार्मिकपणे सभेस संबोधित करताना आजपर्यंतच्या समितीच्या कामकाजाचा आढावा सर्वांपुढे मांडून समितीची आवश्यकता आणि कार्यक्षेत्र विकास संपन्न करण्यासाठी सर्वांना आव्हान केले. जयवंतराव दरेकर पुढे म्हणाले की,पालघर ते सिंधुदुर्ग या दरम्यान विखुरलेल्या कोकण विभागातील विकासात शासनाची उदासीनता आणि कोंकणी माणसांची मौन – सहशिलता यासाठीच या समितीचा उदय झाला आहे. कोणत्याही सरकारी योजनांमध्ये कोकणाच्या पदरी सतत झुकते माप दिले जाते.याला कोंकणी माणूसही तितकाच जबाबदार आहे, आणि इथे कोंकणी माणसाचा स्वाभिमान आड येतो. स्वाभिमानी शंभर टक्के असायलाच हवे पण आपल्याकडील विकासाची कास धरत मायबाप शासनाकडे; मायबाप खासदार – आमदार यांचेकडे सातत्याने हट्ट देखील धरायला शिकले पाहिजे.
यावेळी उपस्थित मंडळींनी कोंकणातील प्रलंबित मागण्या आणि शासनाची दिरंगाई याबाबत अध्यक्षांसह कोंकण विकास समितीचे कार्यकारिणी समोर आपापले मत मांडले
अध्यक्ष महाशयांनी उपस्थिततांकडून आलेल्या सुचना, अपेक्षित शासकीय सुविधा लक्षात घेऊन सर्वांना त्यांच्या समस्या शासनापुढे ठेऊन त्यांचे प्रश्न धसास लावण्यास कोंकण विकास समिती आणि मान्यवर सदस्य कटिबद्ध राहतील याबाबत नमूद केले
दरम्यान समितीचे अध्यक्ष श्री. जयवंतराव दरेकर यांनी आरंभीच या सभेच्या आयोजनाचे मूळ संकेत विषद करताना समितीच्या कार्यकारीणीची एक महत्वाकांक्षी कल्पीत योजना सर्व सभागृहापुढे मांडली की, जर आपल्याला या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर व कोकणचे सलग्न घाटमाथापर्यंत अवाका असलेल्या विभागाचा निश्चितपणे विकास साधायचा असेल मग तो महाराष्ट्र राज्य शासनाकडून असो वा केंद्र शासनामार्फत असो.. आपल्याला जिल्हा निहाय व तालुका निहाय विभाग करून तेथे समितीच्या वतीने विशेष अधिकृत व्यक्तीची नेमणूक करून तेथील स्थानिक विकासासाठीच्या कार्यक्रम पद्धतीमध्ये गती आणि शंभर टक्के विकासकामे साधण्यास चालना मिळेल. हा सर्वात महत्त्वाचा गाभा या सभेच्या आयोजनाचा दिसून आला.
अगदी अलीकडील राज्य शासनाच्या “पालकमंत्री” या पदाप्रमाणेच खरोखरच अध्यक्ष महाशयांचे हे पाऊल वाखाणण्याजोगेच आहे, यात तिळमात्र शंका नाही…आणि असे झाल्यास कोंकण आणि कोंकणी माणूस यांच्या विकासाचा झपाटा गतीशील होईल हे मात्र नक्की.
या सभेत, कोंकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत का विलिनीकरण करणे आवश्यक आहे; विलिनीकरण झालेस काय आणि कोणते फायदे होतील याबाबत रेल्वे अभ्यासक श्री अक्षय महापदी यांनी मुद्देसूद स्पष्ट केले. सावंतवाडी जंक्शनचे लोकनेते मधू दंडवते टर्मिनल(LMDT ) असे नामांतर ही कोंकण विकास समितीची सुरवातीपासून मागणी असून सातत्याने पाठपुरावाही केला जात असलेचे अध्यक्ष श्री जयवंतराव दरेकर यांनी सांगून या विषयावर लवकरच राज्य शासनाकडून पुढील पूर्तता होईल हे स्पष्ट केले.
कोंकण विकास समितीचे सह सचिव श्री मंगेश महाडिक व समन्वयक श्री विजय खोतू दरेकर हे सूत्र संचालन करत असताना कोंकण विकास समिती, तिचा जन्म, अद्याप पावेतो कोकणचे प्रश्नावर केलेला पाठपुरावा, मिळालेले यश आणि कोंकण विकास समितीची भविष्यकालीन दिशा यावर करावयाची चर्चा यावर संबोधित केले.
कोंकण विकास समिती आणि कोंकण विकास समितीचे सदस्य करत असलेले योगदान आणि शासन दरबारी पाठपुरावा ज्याची माहिती आणि प्रसिद्धी जनसामान्यांपर्यंत पोचणे आवश्यक असलेचे कोंकण विकास समितीचे श्री मनोज मधुकर सुर्वे यांनी सुचविले. सदस्य श्री महेश चव्हाण यांनी सुचविले की मुंबई गोवा हायवे दरम्यान गावाकडील लोकांना ग्राम विकास मंत्रालय यांचेकडे शिफारस करून तसेच स्थानिक ग्रामपंचायतींची परवानगी मिळवून कोंकणातील नैसर्गिक पदार्थांची विक्री स्टॉल योजना राबविणेसाठी कोंकण विकास समितीने पुढाकार घ्यावा, कोंकण विकास समिती विकास कामाचे पाठपुरावा दरम्यान संघटनात्मक बांधणीही असावी असे ज्येष्ठ सदस्य श्री सुधाकर मोरे साहेब यानी सुचाविले. नामवंत कबड्डीपटू श्री अंकुश रामचंद्र मोरे यांनी क्रीडा क्षेत्रावर कोंकण विकास समितीने सहकार्य करून आणखी कोंकणात विकास घडविनेसाठी सूचना करून कोंकण विकास समितीचे योगदानात तेही आघाडीवर असती असे सांगितले, सौ रेश्मा दरेकर – काळे या शैक्षणिक सल्लागार म्हणून कोंकणभर वेगवेगळे शैक्षणिक संस्थात मार्गदर्शन करत असलेचे सांगून त्याही कोंकण विकास समिती विकास पाठपुराव्याला सोबत असतील असे सांगितले.
कोंकण मराठी साहित्य परिषद चे अध्यक्ष श्री रमाकांत पाटील साहेब तसेच श्री विकास काशिराम भोसले साहेब यांनीही कोंकण विकास समितीचे कामाचे कौतुक करून भविष्यकालीन विकास आराखडा उपक्रमात प्रभावीपणे सहभाग असेल असे स्पष्ट केले
कोंकणातील स्थानिकांचे होम-स्टे आणि त्यावरील सीआरझेडच्या नावाखालील टांगती तलवार, पर्यटन विकास, शेतकऱ्यांच्या पिक-पाण्यांवरील माकड टोळींचे सावट, शैक्षणिक, वादात्मक ७/१२, आरोग्यविषयक तसेच विस्तृत समुद्र किनारा लाभलेल्या किनारपट्टीवरील मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या समस्या व सागरी किनाऱ्यावरील आंबा – नारळी – पोफळीचे बागायतदार यांची वादळी तडाख्याने होणारी नासधूस व सरकारी उदासीनता, स्थानिक रस्ते, एसटी प्रवास याही उपर राजरोसपणे कोंकणी माणसाच्या जमानींची दलालांमर्फत होत असलेली राजरोसपणे विक्री आणि त्यामुळे कोंकणी माणसांचे भविष्यकालीन जीवनावर होणारा परिणाम – उपद्रवी सुळसुळाट अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती या सभेत प्रामुख्याने घेण्यात येऊन…आपला कोंकण परप्रांतीयांच्या हाती देऊ नका, आपल्या जमिनी विकू नका अशी आर्त साद घालत नजिकचे कालावधीत कोकणचे नैसर्गिक संस्कृती – चालीरिती, कोंकण नृत्य – कला, कोंकण ठेवा, कोंकणातील घडलेले रत्न – गायक, खेळाडू, सायंटिस्ट, सामाजिक संत कोकणची नैसर्गिक खाद्य – खवय्ये व्यवसाय करणारे व्यावसायिक, कोंकण मेवा, आंबा – काजू व इतर फळावल असा परिपूर्ण नियोजित कोंकण विकास महोत्सव कार्यक्रमत त कोंकण मॅरॅथॉन चे आयोजन सर्व कोंकण मायबाप यांना सोबत घेऊन केले जाईल असे सांगितले.
सभेचा समारोप करताना अध्यक्ष श्री. जयवंतराव दरेकर यांच्या डोळ्यात कोंकण व कोकणी माणूस यांच्या बद्दलचा जिव्हाळा प्रकर्षाने जाणवत होता..