रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगडबरोबरच नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आज सुटण्याची दाट शक्यता आहे. अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तसे संकेत दिले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीहून परतल्यानंतर रविवारी याबाबत निर्णय होईल असं सूतोवाच आमदार दळवी यांनी केलं आहेत.आमच्या मनातील पालकमंत्री होईल, असं सांगून आमदार दळवी यांनी भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होतील, असे संकेत दिले आहेत.
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमधील खदखद चव्हाट्यावर आली होती. रायगडचे पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना देण्यात आले होते, तर नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे होते. या दोन्ही जिल्ह्यावर शिवसेनेकडून दावा करण्यात आला. रायगडसाठी भरत गोगावले इच्छूक आहेत, तर नाशिकसाठी दादा भुसे आग्रही आहेत. पालकमंत्रिपद न मिळाल्यामुळे मंत्री भरत गोगावले यांनी खंत बोलून दाखवली होती, त्याशिवाय कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले होते. त्यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांचा निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती.नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि रायगडवरून महायुतीमध्ये खदखद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा केंद्रात सुटणार असल्याचे स्पष्ट दिसतेय. एकनाथ शिंदे यांनी रायगड आणि नाशिकसाठी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याचे आमदार दळवी यांच्या वक्तव्यावरून दिसतेय… महेंद्र दळवी, शिवसेना आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दिल्लीला गेले आहेत. नाशिक आणि रायगडचा तिढा सुटेल, आम्हाला आमच्या मनातील पालकमंत्री नक्की मिळेल…