सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहीदांना श्रद्धांजली…’खाकीचे स्मरण’ ही अभिमानास्पद बाब :पो.नि.संदीप बागुल…

0
35

पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-

सन २०१९ रोजी जम्मू काश्मीर श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याला आज सात वर्षे पूर्ण झाली असून, त्या घटनेचे स्मरण ठेवून हल्ला झाल्यापासून दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेण आणि महात्मा गांधी वाचनालय यांच्या माध्यमातुन शहीदांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता….

या कार्यक्रमाला पेणमधील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले होते…  त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पेणमधील माजी सैनिक सुरेंद्र ठाकुर, राजेन्द्र हटकर, वसंत पोईलकर, लहू पाटील, पेणचे पोलिस निरीक्षक संदीप बागुल, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, काँग्रेसच्या नंदाताई म्हात्रे, शिवसेनेच्या दिपश्री पोटफोडे, ॲड मंगेश नेने, योगेश पाटील विविध सामाजिक कार्यकर्ते, वकील, पोलिस अधिकारी व कर्मचारी, सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळे, राजकिय पक्षांचे पदाधिकारी, शालेय विद्यार्थी, पत्रकार, जेष्ठ नागरिक, महिलावर्ग सुजाण नागरिक व देशभक्त उपस्थित होते….

यावेळी बोलताना पेण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांनी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या माध्यमातुन अशा प्रकारचे पुण्यस्मरण केले जाते याचे मला तर अभिमान वाटतेच पण हे बघून कोणताही खाकी वर्दीला अभिमानच वाटेल असे सांगून पोलिस दलाच्या वतीने श्रद्धांजली वाहिली… तर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांनी आजचा दिवस हा व्हॅलेंटाइन डे म्हणजेच प्रेमाचे प्रतिक म्हणून असला तरी सर्वप्रथम देशप्रेम व्यक्त करावा म्हणून आम्ही दरवर्षी हा जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम करत असतो. व्हॅलेंटाइन डे साजरा करा पण सर्वोच्च प्रेम हे आपल्या देशाप्रती सीमेवर काम करणाऱ्या जवानांसाठी व्यक्त करा असे सांगितले… यावेळी काँग्रेसच्या नंदाताई म्हात्रे, ॲड. मंगेश नेने, माजी सैनिक सुरेंद्र ठाकुर यांनी देखील आपली मते व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली…