मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
भारतीय क्रिकेट जगतासाठी आज एक अतिशय वाईट बातमी समोर आली… मिलिंद रेगेंच्या रुपात मुंबई क्रिकेट तारांगणातील एक लखलखता तारा निखळला…ख्यातनाम क्रिकेटपटू मिलिंद रेगे यांचे दुःखद निधन झाले आहे. मिलिंद रेगे मुंबई क्रिकेट संघाचे अष्टपैलू माजी कर्णधार व निवड समितीचे सदस्य होते…रविवारी १६ फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस होता मात्र किडनी निकामी झाल्याने ते अस्वस्थ होते व त्यांनी अखेर बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला, वयाच्या २६व्या वर्षी देखील त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता आणि त्यामुळेच त्यांना आपल्या आवडत्या क्रिकेट पासून अलिप्त रहावे लागते होते. नाहीतर मिलिंद रेगे आपल्याला टीम इंडियाकडूनही खेळताना दिसले असते.खेळ सोडला तरी ते क्रिकेटशी शेवटपर्यंत संलग्न राहिले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे सदस्य होते, १९८८-८९ दरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची निवड होण्यात त्यांचाच मुख्य सहयोग होता. जगविख्यात क्रिकेटर सुनिल गावसकर यांच्याशी त्यांचे अतूट स्नेहसंबंध होते.मिलिंद रेगे १९६७-७८ पर्यंत मुंबई संघाकडून खेळले. १९८० पासून त्यांनी मुंबई निवड समितीमध्ये काम केले तर २०११ मध्ये निवड समिती-प्रमुख्य म्हणून नियुक्ती करण्यात आली मात्र १९१२ मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पण नंतर १९१५ मध्ये त्यांची प्रमुख निवड-कर्ता म्हणून नेमणूक झाली. रेगे जवळजवळ तिन दशके या पदावर कार्यरत होते.रेगे गोलंदाजी करणारे अष्टपैलू खेळाडू होते, ते उजव्या हाताने फलंदाजी करीत असत व उजव्या हाताने ऑफ स्पीन गोलंदाजी करायचे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी ५२ प्रथम श्रेणी सामन्यात एकूण १२६ विकेट्स घेतांना ८४ धावांत ६ विकेट्स हा त्यांचा गोलंदाजातील सर्वश्रेष्ठ विक्रम होता. तर तिनं वेळा ५ विकेट्स घेण्याचाही त्यांनी पराक्रम केला आहे. त्यांनी एकूण ५२ सामन्यात ७० डावात १५३२ धावांचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.त्यांच्या कुटुंबात त्यांचा मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. मिलिंद रेगे जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळास मुकले असले तरी देशांतर्गत क्रिकेटविश्वात त्यांचे नाव उत्तुंग आहे.