जलजीवन मिशन योजना चांगली,योजनेची अब्रू पुढाऱ्यांनी वेशीला टांगली… दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा,अ‍ॅडव्होकेट राकेश पाटीलांची मागणी…

0
35

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):- 

रायगडच्या अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिंचोटीच्या माध्यमातुन चिंचोटी गावामध्ये जलजीवन मिशन योजना कालावधी उलटुनही योजना पुर्ण केली नसून सदरच्या योजनेमध्ये सरकारी निधीचा लाखो रूपयांचा अपहार/भ्रष्टाचार केला असल्याचा गंभीर आरोप तरुण सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड: राकेश पाटील यांनी केलाय. जलजीवन मिशन योजना  चांगली, पण योजनेची अब्रू लोकप्रतिनिधींनी वेशीला टांगली असल्याचे राकेश पाटील म्हणाले. या योजनेशी संबधित असणाऱ्या ग्रामपंचायत,तसेच कंत्राटदार,ग्रामसेवक,कार्यकारी अभियंता,उपविभाग अभियंता  या लोकसेवकांच्या विरूध्द् भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 318, 198, 199, 201 तसेच भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावी असा तक्रारी अर्ज तरुण सामाजिक कार्यकर्ते अँड. राकेश पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हाधिकारी, रा. जि, परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भारत बास्टेवाड, लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक, यांच्याकडे तक्रार केली आहे.