महाड तालुका येथे नागेश्वरी नदीवर पूल बांधून देण्याची मागणी …. 

0
29

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे ) :- 

महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात नागेश्वरी नदी असून, ही नदी सावित्री नदी आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते… सदर नदीच्या दोन्हीही भागाला सुमारे २० ते २५ गाव आहेत तरी नागेश्वरी नदीवर पूल नसल्यामुळे लोकांना एका बाजूने दुसऱ्या बाजूस जाण्यास पायवाटेचा वापर करीत असल्याने पावसाचे चार महिने नदीवर प्रचंड प्रवाह असून, नदीच्या दोन्ही बाजूचा संपर्क तुटला जातो व सुमारे दहा किलोमीटरचा अंतर पार करावा लागतो… विशेष म्हणजे नदीच्या एका बाजूला कोकण रेल्वेचा वामने येथे स्टेशन असून, काडी पट्ट्यातील मुंबईला राहणारे लोक गावी येण्यासाठी आणि मुंबईला जाण्यासाठी त्यांना रेल्वेने प्रवास करावा लागतो… रेल्वेने प्रवास स्वस्त पडत असल्याने सुमारे ५० रुपयाच्या तिकिटामध्ये लोक मुंबईवरून गावी येतात, पण वामने येथे रेल्वेने उतरल्यानंतर नदीवर पूलाची सेवा नसल्याने रिक्षाने प्रवास करावा लागतो… यामुळे दहा किलोमीटरच्या अंतरिक्षाने करण्यासाठी त्यांना २५० ते ३५० रुपये रिक्षाला मोजावे लागतात… यामुळे खाडीपट्ट्यातील लोकांना अत्यंत भुर्दंड सहन करावा लागतो… जे गरीब लोकांसाठी रोज मजुरी करणाऱ्या लोकांसाठी खूप खर्चिक बाब असल्याने, नागेश्वरी नदीवर पूल झाल्यास अप्पर पुढील नरवण, बेलोशी, कुंबळे, कुडीक गावांच्या अंतर ६ किलोमीटर कमी होईल व सदरच्या पुलावर बांधला जाणारा बंधारा नागेश्वरी नदीमध्ये भरतीमुळे एमआयडीसी दूषित पाणी योगेश्वरी नदीमध्ये घुसतो ज्यामुळे त्या भागातील मिल पाणी योजना दुसरी झाली आहे…. तरी सदर पूल झाल्यास भरतीचे पाणी थांबून होणारा दूषित पाणी थांबविता येईल ते देखील थांबण्यास येईल जेणेकरून नागेश्वरी नदीतील पाणी योजनेचा फायदा होईल तरी सदर पूल मंजूर करून द्यावा अशी मागणी महाड तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयवंत दळवी व अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे…