श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
श्रीवर्धन तालुक्यातील निगडी गाव सहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी टाकीच्या समस्येने त्रस्त होते…. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजा भाऊ ठाकूर यांनी दिलेल्या वचनानुसार, १० हजार लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी ग्रामस्थांना मिळाली आहे…. या टाकीचा लोकार्पण सोहळा १८ फेब्रुवारी २०२५ रोजी निगडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला…
यावेळी कार्यक्रमात ८६ वर्षीय ज्येष्ठ राजकीय नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सदानंद येलवे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली… “सहा वर्षे आम्ही पाणीटंचाईची समस्या सोसत होतो, पण कोणीही लक्ष दिले नाही… मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी कुठे गेले होते?” असा सवाल करत राजा भाऊ ठाकूर यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले…
राजा भाऊ ठाकूर यांनी गेल्या १४ डिसेंबर २०२४ रोजी श्रीवर्धन तालुक्यातील काळींजे, निगडी, चिखलप आदी गावांना भेट दिली होती… त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येची व्यथा मांडली… ठाकूर यांनी त्यावेळी “मी नवीन टाकी उपलब्ध करून देईन” असे आश्वासन दिले होते… त्यांनी दिलेला शब्द पाळत आज ग्रामस्थांना पाणीटाकी मिळवून दिली आहे…
कार्यक्रमात बोलताना सदानंद येलवे यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावत म्हटले, “सहा वर्षे आम्ही पाणीटंचाईने त्रस्त होतो, पण कुठे गेले मंत्री? कुठे गेले आमदार? आज एक समाजसेवक येतो आणि आमच्या समस्येवर उपाय शोधतो, हे लाजिरवाणे नाही का?… या सोहळ्यास राजा भाऊ ठाकूर, सदानंद येलवे, रायगड जिल्हा काँग्रेस सचिव डॉ. नरेंद्र सिंग, माणगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष विलास सुर्वे, श्रीवर्धन तालुका उपाध्यक्ष इम्तियाज कोकाटे, सचिव गणपत गमरे, म्हसळा नगरसेवक सुफियान हलदे, रक्षित संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पवार, दिनेश खैरे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…
राजा भाऊ ठाकूर हे श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा आणि रोहा तालुक्यात नियमितपणे दौरे करत जनतेच्या समस्या जाणून घेतात व सोडवतात… अलिबागहून तब्बल १५० किलोमीटरचा प्रवास करत या लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावली… त्यांची ही तळमळ पाहून मतदारसंघात काँग्रेस पक्षात नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश वाढताना दिसत आहे… टाकी लोकार्पण झाल्यानंतर गावकऱ्यांनी राजा भाऊ ठाकूर यांचा सत्कार केला…. वृद्ध महिलांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवून कृतज्ञता व्यक्त केली… ग्रामस्थांनी ठरवले की पुढील निवडणुकीत राजा भाऊ यांचे मनोभावे समर्थन करणार…. राजा भाऊ ठाकूर यांनी केवळ आश्वासन नाही, तर प्रत्यक्ष कृती केली, हे यातून स्पष्ट होते…. सत्ताधारी नेत्यांनी यावरून धडा घ्यावा, अशी चर्चा गावात रंगली आहे….