मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची महाअंतिम फेरी आज रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांच्या टीम आज एकमेकांचा सामना करणार आहेत. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सगळ्या सामन्यांमध्ये विजय मिळवत आजच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर न्यूझीलंडच्या टीमला लीग मॅचमध्ये भारताकडून पराभव पत्करावा लागला आहे. सन २००० मध्ये या दोन्ही देशांमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना पार पडला होता, त्यावेळी किंवीने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नांव कोरले होते. आता तब्बल २५ वर्षांनी हा हिशोब चुकता करण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे आणि म्हणूनच साऱ्या भारतीयांचे लक्ष आजच्या या सामन्याचे लागले आहे. किंवीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ती पहिलीच वेळ होती. आता टीम इंडियाला आजचा सामना जिंकून परतफेड करण्याची सुवर्णसंधी आहे.