नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
कळम मुरबाड रोडवर सायंकाळी ६ वाजता ब्रिजा कार चालक याने दोन मोटरसायकलींना जोरदार धडक देऊन वाहन चालक फरार झाल्याची घटना घडली आहे… दिनांक १७ मार्च २०२५ रोजी कळम मुरबाड रोडवर वडाचीवाडी पोस्ट निळे तालुका मुरबाड येथे राहणारे रहिवासी हे सकाळी आठ वाजता घरातून मौजे सालोख येथे वॉल कंपाऊंडचे काम करण्यासाठी पाच जण गेले होते… संध्याकाळी काम पूर्ण करून ते घरी जात असताना कळम पोलीस ठाण्याच्या पुढील वळणावर वाहन क्रमांक mh ०५ एफ ४०३३१ ब्रीजा या सफेद रंगाच्या गाडीने दोन गाड्यांना जोरदार ठोकर देऊन जखमी केले…. ठोकर इतकी जोरात दिली की त्यामध्ये धनाजी हनुमंत सोंगाळ, विष्णू हरी सोंगाळ, मालू बाबू मेंगाळ व विजय मोतीराम वेंगाळ हे जखमी अवस्थेत रोडवर पडले होते… त्यावेळी येथे मदतीसाठी थांबलेल्या वाहन चालकांनी कळम सरकारी रुग्णालयात दाखल केले…
तर धनाजी हनुमंत सोंगाळ यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचाराकरिता एमजीएम रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला…वाहन चालक शैलेश दशरथ देशमुख राहणार जडई, तालुका मुरबाड यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले परंतु पोलिसांनी त्याला अटक न करताना सोडून दिले आहे, असा आरोप जखमींच्या नातेवाईकांनी केला आहे…
शवविच्छेदन करून झाल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी बॉडी घेण्यास नकार दिला… जोपर्यंत आरोपी यास आपण अटक करत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता… परंतु पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर बॉडी ताब्यात घेऊन नातेवाईक आपल्या घरी गेले… याबाबत नेरळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा क्रमांक ५० प्रमाणे नोंद घेतली असून, भारतीय न्यायसहिता बी एन एस २०२३ प्रमाणे १०६ (१), २८१, १२५, (a),(b), १८४,१३४ प्रमाणे नोंद केली आहे… याबाबत अधिक तपास पोलिस उप निरीक्षक वसावे करीत आहेत…