मुंबई शिवसत्ता टाइम्स (धनश्री रेवडेकर) :-
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सचिन अहिर हे एक प्रगल्भ, अभ्यासू आणि तडफदार नेतृत्व म्हणून ओळखले जातात…सध्या ते शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते असून, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आहेत. राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच त्यांनी आपल्या अभ्यासू दृष्टिकोनाने आणि प्रखर नेतृत्त्वगुणांनी स्वतःची वेगळी छाप पाडली आहे…
सचिन अहिर यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमधून झाली. १९९९ मध्ये वरळी मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेले आणि त्यानंतर त्यांनी सातत्याने आपल्या कामाचा ठसा उमटवला. २००९ मध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्रीपद भूषवताना त्यांनी प्रशासनावर उत्तम पकड ठेवली आणि राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या या कार्यशैलीमुळेच त्यांना विविध पदांवर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली.
२०१९ मध्ये त्यांनी मोठा राजकीय निर्णय घेत शिवसेनेत प्रवेश केला. हा निर्णय काहींना धक्कादायक वाटला असला, तरी सचिन अहिर यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि नेतृत्वगुणांनी पक्षातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. त्यांच्या या प्रवासाचा सर्वोत्तम टप्पा म्हणजे २०२२ मध्ये विधान परिषदेवर निवड होणे. त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यशैलीला पक्षश्रेष्ठींनीही मान्यता दिली आणि आज ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात.
सचिन अहिर हे केवळ राजकीय नेता नसून,एक संवेदनशील समाजसेवक देखील आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. तरुणांना रोजगार मिळावा, झोपडपट्टी भागातील लोकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणा व्हावी, यासाठी त्यांनी कायमच प्रयत्न केले आहेत. त्यांची काम करण्याची शैली आणि लोकांसोबत जोडून राहण्याची वृत्ती त्यांना जनतेमध्ये अधिक लोकप्रिय बनवते.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त,त्यांच्या कार्याचा आढावा घेतल्यास लक्षात येते की सचिन अहिर हे केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता,समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे एक प्रभावी नेतृत्व आहेत. त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी अनेक शुभेच्छा…त्यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत व पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांच्याकडून लक्ष लक्ष शुभेच्छा…