चलो मुंबई…शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी व मागण्यांसाठी… रविकांत तुपकर यांचे अरबी समुद्रात सत्याग्रह आंदोलन…  

0
25

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):- 

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो समर्थकांना खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतले.गनिमी काव्याने भूमिगत होऊन रविकांत तुपकर मुंबईत दाखल होणार होते,पण खालापूर पोलिसांनी त्यांना दुपारपर्यंत नढाळ येथील पंचायत मंदिरात रोखून ठेवले आहे. मुंबईकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या गाड्या अडवून ठेवल्या आहेत… राज्यातील शेतकरी यांच्या कर्जमाफीसाठी मुंबईत आंदोलन होणार होते… पुणे येथे तीन मार्च रोजी झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी बैठकीत रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करा, सोयाबीन कापूस भाव फरक, पीक विमा यासह अन्य मागण्या केल्या होत्या. मागण्यांबाबत सरकारला अल्टिमेट देत १८ मार्चपर्यंत त्या मान्य न केल्यास स्व.साहेबराव करपे यांच्या बलिदान दिनी १९ मार्च रोजी कर्जाचा बोजा असलेले शेतकऱ्यांचे सातबारे व सोयाबीन,कापूस अरबी समुद्रात बुडू असा इशारा दिला होता.त्यांच्या या इशाऱ्याने सरकार चांगलेच बीथरले आहे. १७ मार्चच्या सायंकाळीच पोलिसांनी रविकांत तुपकर यांचे घर आणि ऑफिसला वेढा टाकला होता,त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना अर्ध्या रात्री झोपेतून उठवून पोलिसांकडून जबरदस्तीने धरपकड करण्यात आली. कुटुंबीय व नातेवाईकांनाही त्रास दिला असा आरोप नढाळ येथे जमलेल्या शेतकरी यांनी केला.याही परिस्थितीत कर्जाचे सातबारे समुद्रात बुडवणारच असा गनिमी कावा करून भूमिगत होत रविकांत तुपकर मुंबईत दाखल होणार होते.राज्यभरातील त्यांचे कार्यकर्ते देखील मुंबईत पोहोचले आहेत. या साऱ्या परिस्थितीत रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

रविकांत तुपकर यांनी तीन मार्च रोजी चळवळीचे केंद्र असलेल्या पुणे येथे संघटनेची पहिली राज्यव्यापी बैठक घेतली. या बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या आक्रमकपणे मांडल्या आणि १८ मार्चपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता.निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. सरकारला या आश्वासनाची आठवण करून देत १८ मार्चपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास स्व. साहेबराव करपे यांच्या बलिदान दिनी १९ मार्च रोजी मुंबईत आंदोलनाचा बॉम्ब टाकणार असल्याचा इशारा दिला. कोणते आंदोलन करणार हे न सांगितल्यामुळे रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची चांगलीच उत्सुकता लागली होती. दरम्यान, सरकारने अधिवेशन संपत आले तरी शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्या नाहीत. यामुळे रविकांत तुपकर व राज्यभरातील कार्यकर्त्यांनी मुंबई येथील आंदोलनाची जोरदार तयारी केली आहे.शिवणी आरमाळ येथे स्व. कैलास नागरे यांना श्रद्धांजली अर्पण करून ते मुंबईकडे रवाना झाले. बुलढाणा जिल्ह्यातून जवळपास अडीचशे गाड्या तर इतर जिल्ह्यातूनही हजारो शेतकरी मुंबईला जाणार होते. सद्या ते खालापूर तालुक्यातील नढाळ येथे आहेत. घटनेने दिलेल्या अधिकारा नुसार आम्ही शांतता व सनदशीर मार्गाने आंदोलन करणारच म्हणत गनिमी पद्धतीने गुप्त मार्गाने मुंबईत दाखल होण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. बुलढाण्यासह राज्यभरातील त्यांचे कार्यकर्ते देखील मिळेल त्या साधनाने मुंबईत पोहचण्याचा प्रयत्न आहेत… या साऱ्या परिस्थितीत रविकांत तुपकर यांचे आंदोलन कोठे आणि कसे होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासना नुसार, शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करावा, कापूस व सोयाबीन प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक द्यावा, कांदा,दूध व धान उत्पादकांना अनुदान द्यावे, ऊसाला एकरकमी एफआरपी, जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतीला कंपाऊंड, कल्याण रेल्वे मार्गामुळे विस्थापित होत असलेल्या झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करावे, अशा मागण्या पुणे येथील संघटनेच्या बैठकीत केल्या  होत्या. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड हेही या ठिकाणी उपस्थित आहेत.