मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
आज २२ मार्चपासून आयपीएलच्या १८व्या मोसमातील पहिला सामना गतविजेता केकेआर व आरसीबी संघात कोलकाता येथील ईडन गार्डनवर खेळवण्यात येण्याचे निश्चित होते मात्र या आरंभीच्या सामन्यावर पावसाचे दाट सावट आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांचा भ्रमनिरास होऊ शकतो.एक्यूवेदरच्या अहवालानुसार शनिवारी सकाळी पावसाची ९० टक्के शक्यता आहे, तर संध्याकाळी आद्रता ७७ टक्के असेल आणि वारे यांनी २२ कि.मी. वेगाने वाहतील, त्यामुळे पाऊस पडला तर हा सामना नक्कीच रद्द होण्याची दाट शक्यता संभावते आहे.