रायगड रोपवे प्रशासनाचा अभिमानास्पद कृतिशील उपक्रम… हजारो दिव्यांगांना रोपवेतून विनामूल्य घडवले राजांचे दर्शन…

0
35

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

स्वराज्यसूर्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून ऐतिहासिक अशा अभेद्य किल्ले रायगडाची निवड केली… इथूनच लोकाभिमुख,रयतहित जोपासणारा व जगाला आदर्श ठरावा असा राज्यकारभार राजांनी करून दाखविला… छ.शिवरायांच्या शौर्य व पराक्रमाने पावन झालेल्या किल्ले रायगडावर जाऊन राजांचे दर्शन घेण्याची प्रत्येक शिवप्रेमी,भारतीयांची तळमळ व इच्छा असते…रायगड रोपवे प्रशासनाने अभिमानास्पद व कृतिशील उपक्रम राबविला…  यामध्ये रोपवे व्यवस्थापक श्री खातू सर यांच्या पुढाकाराने हजारो दिव्यांगांना रोपवेतून विनामूल्य दर्शन घडवले. दिव्यांग बांधवांनी राजांना अभिवादन केले…यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर निखळनारा आनंद पाहण्यासारखा होता…

दि.3 डिसेंबर 2021रोजी चार वर्षापूर्वी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून रोपवे प्रशासनाने दिव्यागांना रोप वे प्रवास विनामूल्य करण्याचा निर्णय घेतला होता.तेव्हापासून ही विनामूल्य सेवा रोपवे प्रशासनाने आजपर्यंत व या पुढेही दिव्यांगांसाठी चालू ठेवली जाणार आहे अशी माहिती रोपवे व्यवस्थापक श्री खातू यांनी दिली…गेल्या २ दिवसांत आत्तापर्यंतच्या काळातील सर्वाधिक सुमारे 700 ते 800 दिव्यांगानी रोप वे ने प्रवासाचा आनंद घेतला…अशी माहिती रोप वे प्रशासनाकडून देण्यात आली…रोपवेने दिलेल्या या सेवेबद्दल दिव्यांग बांधवांनी रोपवे व्यवस्थापनाचे आभार मानले…