चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम) :-
आगामी काळात येणारे सण उत्सव शांततेत आणि भयमुक्त वातावरणात साजरे करताना सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता सण उत्सव साजरे करा जेणे करून जिल्ह्यात जातीय सलोखा राखण्यासाठी मदत होईल असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे…
आगामी काळात गुढीपाडवा, रमजान ईद, महावीर जयंती, श्रीराम नवमी, हनुमान जयंती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असे उत्सव शांततेत पार पाडण्याचे दृष्टीने रायगड जिल्हा अधिकारी किशन जावळे व रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी रायगड जिल्हा शांतता समिती बैठक अलिबाग येथे जिल्हा नियोजन भवन येथे आयोजीत केली होती, त्या प्रसंगी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या…. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत वास्तेवाड, जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, तालुका मोहल्ला कमिटी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांची एकत्रित बैठक झाली यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या…. या बैठकीचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले….
सदर बैठकीमध्ये शांतता समिती सदस्य, मोहल्ला कमिटी व पत्रकार यांनी सूचना मांडल्या…. रायगड जिल्ह्यात भयमुक्त वातावरण आणि जातीय सलोखा राखून सण उत्सव साजरे केले जातील आणि त्या-त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखून असणाऱ्या समस्या दूर करून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली… यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी काही सूचना केल्या… कोणत्या प्रकारे काम केलं पाहिजे तसेच सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह मेसेजला कशाप्रकारे आळा घालता येईल व त्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, वीज पुरवठा अखंडित राहील, ज्या ठिकाणी पाणी समस्या आहे, तिथे व्यवस्था करणे, शांतता समिती सदस्य यांना ओळख पत्र देणे, एखाद्या ठिकाणी काळोख असेल तिथे हॅलोजन सुविधा देणे, निवडणूक काळातील सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी सणाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक वळविणे, रस्त्यावरील खड्डे बुजवावे, सण उत्सव झाल्यावर त्यात्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात यावे,कार्यक्रमाला ज्यांना निमंत्रित केले त्यांनी जातीय तणाव निर्माण होणार नाहीत असे वक्तव्य करू नये असे आवाहन करावे, सण उत्सव काळात सार्वजनिक सुट्टी असल्याने पर्यटक जिल्ह्यात येतात त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करणे, रुग्णवाहिका व अग्निशमन दल तयार ठेवावे, शांतता व सुव्यवस्था राहण्याच्या दृष्टीने योग्य ती दक्षता घेणे या बाबत सूचना दिल्या…. खालापूर तालुक्यात मुस्लिम समाजाने गोवंश पालन करण्याचा केलेला निर्णयाचे अभिनंदन करण्याचा ठराव खोपोलीचे माजी नगराध्यक्ष डॉ सुनील पाटील यांनी मांडला होता, त्यांचे अभिनंदन देखील मंत्री आदिती तटकरे यांनी केले… यावेळी यासीन भालदार, माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील, आतीक खोत, अबू जळगावकर, यांच्या सह जिल्ह्यातील शांतता समिती सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते….