अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर , अमूलकुमार जैन):-
कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत विरोधात वांजळे गावचे ठाकरे कुटुंब गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेत… गावात एका अंतर्गत रस्त्याच्या कामातील उरलेला सिमेंट मटेरियल हा या ठाकरे कुटुंबाच्या जागेत टाकल्याने तेथील 2 घरांना रस्ता बनवून दिल्याचा आरोप ठाकरे कुटुंबाने ग्रामपंचायतवर केला आहे… आमच्यावर ग्रामपंचायत अन्याय करत असून आमच्या वहीवाटीच्या जागेत ग्रामपंचायतीने जाणून बुजून अतिक्रमण केल्याचा देखील दावा कमलेश बळीराम ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाने केला आहे… यावरून या कुटुंबाने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण सुरु ठेवलंय…