आदिवासी बांधवांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रमदानातून साजरा केला गुढीपाडवा… पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचा पुढाकार…

0
20

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

गुढी पाडव्यानिमित्त सर्वत्र गुढी उभारून, शोभा यात्रां काढून विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात… पेण तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत बोरगाव हद्दीतील उंबरमाळ आदिवासी वाडीतील ग्रामस्थ व ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मात्र आदिवासी वाडीच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी श्रमदानातून नैसर्गिक झऱ्याचे खोलीकरण करून जलस्त्रोतांचे बळकटीकरण करीत गुढी पाडवा साजरा केला आहे. सुमारे १२५ च्या आसपास लोकसंख्या असलेल्या पेण तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत बोरगाव हद्दीतील उंबरमाळ आदिवासी वाडीत एकच विहीर असून त्यातील पाणीसाठा कमी झाल्याने येथील आदिवासी बांधवांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय हे लक्षात घेऊन ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी ग्राम संवर्धनच्या कार्यकर्त्यांसह वाडीतील सर्व ग्रामस्थांना एकत्रित करीत वाडी च्या पाणी समस्येबाबत उंबरामाल वाडीत बैठक घेतली त्या बैठकीतून आदिवासी बांधवांनी वाडीच्या खालच्या बाजूला साधारण पाचशे मीटर अंतरावर असलेल्या एका लहानशा झऱ्याला भरपूर पाणी असल्याचे सुचविल्यानुसार रविवारी गुढी पाडव्याच्या दिवशी सर्व ग्रामस्थ व ग्राम संवर्धनच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून या झऱ्याचे खोलीकरण करण्याचे ठरविले आणि आदिवासी बांधवांच्या या प्रयत्नाला यश आले असून या झऱ्याला भरपूर पाणी लागले असून त्या ठिकाणी विहीर बांधल्यास वाडीच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटेल असा विश्वास स्थानिक आदिवासी ग्रामस्थ यशवंत वाघमारे यांनी व्यक्त केला आहे.