मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
विदर्भातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीतून समृद्ध करण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या सहकार्याने विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे… यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल होत असून रेशीम शेतीला अधिक चालना देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले आहेत… तुती व टसर रेशीम उद्योगाच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळविण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने तयार करून पाठपुरावा करावा, रेशीम उद्योग कार्यालय नसलेल्या जिल्ह्यांमध्ये भाजपच्या मदतीने कार्यालय कार्यान्वित करण्याबाबत नियोजन करावे अशा सूचना मा. मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत…