मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे) :-
भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर अवलंबून आहे… वैदीक गणिताच्या खंडाद्वारे हे ज्ञान नव्याने समाजासमोर येणार आहे. या वैदिक गणिताची महती व उपयोग येणाऱ्या पिढ्यानपिढ्यांना पोहोचणे गरजेचे आहे… त्याकरिता “भारती कृष्ण विद्या विहार” येथे वैदीक गणिताचे गुणवत्ता केंद्र उभारले जावे अशा अपेक्षा व्यक्त करत यास शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रतिपादन केले….
विश्व-पुनर्निर्माण केंद्र संघ संचालित भारती कृष्ण विद्या शाळेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आद्य शंकराचार्य कृष्णतीर्थ महाराज लिखीत वैदीक गणिताच्या २ खंडांचे प्रकाशन झाले त्यावेळी फडणवीस बोलत होते…. विश्व-पुनर्निर्माण संघाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार काळे, सरचिटणीस शैलेश जोगळेकर, संचालक मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते….