मुंबईतील कुलाबा ते पायधूनी मार्गे क्रॉफर्ड मार्केट आणि बोरीबंदर ते पायधूनी मार्गे काळबादेवी असे दोन रूट म्हणजे मार्ग सुरुवातीला दर डोई ३आणे प्रवास-भाडे आकारून सुरू करण्यात आले. पुढे “बॉम्बे ट्रामवे कंपनी” पालिकेने ताब्यात घेतली…. आणि घोड्यांच्या सहाय्याने ओढल्या जाणाऱ्या या ट्राम गाड्यांची जागा ऑटोमोबाईल ट्राम गाड्यांनी घेतली.
सन १९०५ मध्ये “बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय एण्ड ट्राम-वेज कंपनी लिमिटेड (बेस्ट)” या कंपनीची स्थापना झाली. पुढे दोन वर्षांनी शहरात इलेक्ट्रीक ट्राम्स दाखल झाल्या. तेव्हापासून मुंबईत वाहतूक नियंत्रण सुरू झाले. पुढे सप्टेंबर १९२० मध्ये जास्त गर्दीवर काबू मिळवण्यासाठी डबल डेकर ट्राम सेवा सुरू करण्यात आली. दरम्यान शहरातील रेल्वे जालव्यूहाची उन्नती होईपर्यंत या ट्राम सेवेने लोकांच्या गरजा भागविण्यात आल्या आणि ३१ मार्च १९६४ रोजी मुंबईतील ट्राम सेवेला लाल कंदील दाखविण्यात आला.
दिनांक ३१ मार्च १९६४ मध्ये ही सेवा बंद करण्यात आली. मुंबईतील खोदादाद सर्कल (आताचे प्रचलित दादर टी. टी.) ते बोरीबंदर (म्हणजे आताचे व्ही. टी.) ही मुंबईकरांच्या जीवाभावाची अंतिम ट्राम सेवा ठरली.