रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
आपल्या रोखठोक आणि परखड भूमिकांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या माजीं आमदार पंडित पाटील यांनी आज राज्य सरकारवर सडकून टीका केली. रायगड जिल्ह्याचे अलिबाग येथील सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी शेकाप नेते , माजी आमदार जयंत पाटील यांनी आवाज उठवून लक्षवेधी सूचना मांडली, त्यांनतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र पाटील यांनी जयंत पाटील यांना नूतनीकरणाचा शब्द दिला, पण आता भूमिपूजन कार्यक्रमात जयंत पाटील यांना डावळले गेले अशी नाराजी पंडित पाटील यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात जणू केवळ उदघाटनाची स्पर्धा लागली आहे. रायगड जिल्ह्यावर अधिकाऱ्यांचे राज्य आहे, त्यांच्यावर कुणाचाही अंकुश नसल्याचे पंडित पाटील संतापाने म्हणाले. याबरोबरच पंडित पाटील यांनी यावेळी रायगड जिल्ह्यातील विकासाला खीळ बसवणाऱ्या राजकारणावर ही सडेतोड भाष्य केली. रायगड जिल्ह्याचे रखडलेले पालकमंत्रीपद, विकासनिधी चा अभाव, फसलेल्या जलजीवन मिशनच्या नळ पाणीपुरवठा योजना , ठेकेदारांची प्रलंबित बिले ,रायगड जिल्हा सामान्य रुग्णालय भूमिपूजन कार्यक्रमात खासदार, माजी आमदारांना डावळले असल्याने माजी आमदार पंडित पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली…