अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
किरकोळ कारणावरून झालेल्या वादामध्ये दगडाने ठेचून ठार मारल्याची घटना खालापूरमध्ये घडली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने खून करणाऱ्याला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतले. खालापूर तालुक्यातील नावंढे येथील खोपोली-कर्जत रेल्वे लाईनमधील पुलाजवळ 26 एप्रिलला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात कोणत्यातरी हत्याराने जखम करून ठार केले असल्याचे दिसून आले. पुरावे नष्ट करण्यासाठी दगडाने मारून आरोपी पसार झाला होता.
या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर व 12 अंमलदार यांचे दोन पथक तयार करण्यात आले. आपल्याकडील असलेले कौशल्य, तांत्रिक तपास आणि खबऱ्यांकडून माहिती प्राप्त करण्यात आली. गुन्ह्यातील संशयीत उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर व चार पोलीस कर्मचारी यांना तात्काळ उत्तरप्रदेशमध्ये रवाना करण्यात आले. या पथकाने लवकूश पासवान याला उत्तरप्रदेशमधील कुलाहामधून ताब्यात घेतले. पोलीसी दणका मिळाल्यावर तो बोलका झाला.
सुभाष विश्वकर्मा हा इसम खालापूरमधील गोदरेज कंपनीत कामाला होता. आरोपी लवकुश पासवान याच्या शेजारी गेल्या काही दिवसांपूर्वी सुभाष राहण्यास आले होते. दोघांची ओळख झाली होती. 22 एप्रिल रोजी सुभाष आणि आरोपी या दोघांनी मद्यपान केले होते. त्यानंतर दोघांमध्ये काही कारणास्तवर शाब्दीक वाद झाला. हा वाद विकोपाला गेल अखेर पासवान याने विश्वकर्मा याला खाली पडून त्याच्या छातीवर डोक्यावर दगड मारले…यामध्ये विश्वकर्मा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.