नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्री १०.३० वाजता बिरदोले गावात ३० एप्रिलच्या २०२५ च्या रात्री अपघातग्रस्त जखमी तरुणाच्या चौकशीवरून वाद निर्माण झाला…त्या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले आणि त्यात तेथे भांडण सोडण्यासाठी आलेले महिलेची छेड काढण्यात आल्याची घटना घडली.याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे सात जणांवर गुन्हा दाखल केला असून पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे…
३० एप्रिल रोजी बिरदोले गावात रात्री साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास गावातील तरुण निखिल परशुराम कालेकर याचा अपघात झाल्याने त्याचे काका सतीश कालेकर हे रुग्णालयात घेवून गेले होते…अपघात घडला त्यावेळी कालेकर आणि मानिवली गावातील तरुण यांच्यात वाद निर्माण झाला होता…त्यांनतर मानीवली,बिरदोले आणि देवपाडा येथील सात तरुण हे निखिल परशुराम कालेकर याचे घरासमोर जमले…त्यावेळी अंजना परशुराम कालेकर या त्यांच्या अंगणात उभ्या होत्या. त्यावेळी ते सात तरुण आले आणि त्यांनी अंजना परशुराम कालेकर तसेच साक्षीदार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली…जोरजोराने सुरू असलेला आवाज ऐकून परशुराम वाळकु कालेकर,अंजना परशुराम कालेकर आणि प्रेम परशुराम कालेकर हे एकत्र आल्यावर त्यांना तेथील प्लास्टिक खुर्ची तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली…त्यात फिर्यादी यांची छेड काढून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यात आले व सतीश भेटला नाही तो जिथे भेटेल त्याचा मुर्दा पाडल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी देण्यात आली असे फिर्यादी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत नेरळ पोलिसांनी भारतीय दंड संहिता २०२३चे कलम १८९(२),१९१(२), १९१(३), १९०, ७४, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून न्यायालयाने पाच जणांना एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे…अधिक तपास शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शना खाली पो.उप नि.दहातोंडे करीत आहेत.