चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
केंद्र सरकारची पीएम जनमन योजना आणि राज्यातील आभा योजना या दोन्ही योजनांद्वारे कातकरी समाजासह सर्व आदिवासी कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प आहे, त्यासाठी १३ विभागांच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी त्या त्या अधिकारी यांनी करावी, या योजनांची परिपूर्ण माहिती आदिवासी बांधव यांना देण्यात येईल,” असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके यांनी खालापूर तालुक्यातील बोरगाव आंबेवाडी येथील आदिवासी संवाद मेळाव्यात दिले… ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पीएम जनमन’ सारख्या धोरणात्मक योजनांच्या माध्यमातून कातकरी व इतर आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे… राज्य सरकारने सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘आभा’ योजना जाहीर केली असून, येथील आदिवासी बांधव यांच्यासाठी पोटतिडकीने काम करणारे आमदार महेश बालदी यांचे आदिवासी बांधव यांच्या प्रती असलेले प्रेम पाहून मी भाराऊन गेलो आहे आणि त्याचमुळे मी येथे आल्याचे मंत्री यांनी सांगितले… राज्य सरकारने १०० दिवसांचा कृती आराखडा आखण्यात आला आहे, त्याचा उद्देश यशस्वी होत आहे असेही त्यांनी सांगितले… कार्यक्रम स्थळी येताना आदिवासी महिलांनी मंत्री महोदय यांचे औक्षण केले… रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांनी मंत्री अशोक वुईके व मान्यवरांचे स्वागत केले… आपल्या प्रास्ताविक मध्ये कार्यक्रमाचे संयोजक व मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे यांनी आदिवासी विकास करताना वन विभाग आणि अन्य शासकीय कार्यालयांच्या येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला…
कार्यक्रमापूर्वी मंत्री महोदयांनी आमदार महेश बालदी यांच्या मतदार संघात येणाऱ्या तीन तालुक्यांतील स्थानिक आदिवासी समाजाशी संवाद साधून योजनांची अंमलबजावणी कशी होते आहे याचा आढावा घेतला… त्यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, “ही वाटचाल निश्चितच आदिवासी समाजाला समृद्धीकडे घेऊन जाणारी आहे… “वन विभाग यांच्या अडचणी दूर करण्यासाठी वन मंत्री गणेश नाईक यांची बैठक होत असून, या देशात कायदा येण्यापूर्वी आदिवासी बांधव या देशात राहत आहेत, त्यामुळे प्रशासकीय अधिकारी यांनी कायद्याचा बडगा दाखवू नये असे आवाहन करून आदिवासी बांधव यांच्यासाठी प्रमाणपत्र वितरण कॅम्प, आरोग्य कक्ष स्थापन केल्याचे सांगून भाजप कार्यकर्त्यांनी त्याचा लाभ आदिवासी बांधव यांना करून देण्याचे आवाहन केले… एवढ्या दुर्गम भागात देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर प्रथमच एक मंत्री आणि आमदार आल्याचे आदिवासी बांधव यांनी सांगितले… कार्यक्रमास पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, माजी सरपंच राजू मोरे, माजी सभापती रामदास ठोंबरे, जेष्ठ नेते विनोद भोईर, कृष्णा पारंगे,सरपंच सौ.मोरे, प्रितेश मोरे, गणेश कदम, सरपंच रविंद्र कुंभार, आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी यांच्यासह संवाद मेळाव्यात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते…