कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके) :-
सन २००५ साठी सरपंच पदाचे आरक्षण चुकीच्या पद्धतीने केले गेले आहे… सध्या हे आरक्षण अनुसूचित जमातीचे आहे, परंतू निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केल्याप्रमाणे २०१० ते २०२० चे आरक्षण पुनरावृत्ती होणार नाही असे आहे परंतू प्रत्यक्षात याची पुनरावृत्ती झाल्याचे दिसत आहे….
२०१० मध्ये अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले गेले होते… २००५ पासून २०१५ पर्यंत जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेले आरक्षण आणि प्रत्यक्षात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेली अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने झाल्याचे समोर येत आहे… प्राप्त कागदपत्रानुसार २००५ ते २०१५ पर्यंत सरपंच पदाचे आरक्षण एक आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी सरपंच पदाची निवडणूक वेगळीच केली आहे त्यामुळे यामध्ये प्रवर्गाची अर्थात आरक्षणाची भिन्नता दिसत आहे…
कर्जत तालुक्यातील फक्त पोशीर ग्रामपंचायत येथील आरक्षणाबाबत असे चित्र आहे तर उर्वरित ५४ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाचे काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे व यावर निवडणूक निर्णय अधिकारी काय भूमिका घेतील याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे…