खासदार सुनिल तटकरे तिसऱ्यांदा खासदार होणार नाहीत… 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळ्यामुळे महायुती सत्तेत…

0
9

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाले होते त्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 150 आमदार निवडून येणे गरजेचे होते. मात्र ईव्हीएम घोटाळा झाला, कशा पद्धतीने निवडणूका जिंकल्या हे संपूर्ण महाराष्ट्र व देशाला माहीत आहे. 2019 व 2024 या निवडणुकीत खासदार सुनिल तटकरे हे निवडून येऊन खासदार झाले असतील मात्र येणाऱ्या 2029 च्या निवडणुकीत ते जनतेतून खासदार म्हणून निवडून येणार नाहीत असा हल्लाबोल काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांनी केला. श्रीवर्धन रायगड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजाभाऊ ठाकूर यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. याचवेळी त्यांनी काँग्रेस पक्ष रायगड जिल्ह्यात संघटनात्मक दृष्टया अधिक मजबूत व बळकट होणार असल्याचा विश्वास ही व्यक्त केला. मी देखील माजी आमदार मधूशेठ ठाकूर यांचा मुलगा आहे.कुणाच्या कट कारस्थानाला घाबरणार नाही जशास तसे उत्तर देईन, असा इशारा राजाभाऊ ठाकूर यांनी दिला.

जनता काँग्रेस व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला मानत आहे, काँग्रेसची धोरणे जनतेला हवी आहेत, आताचे राजकारण कुणाला ही पोषक नाही, स्वार्थी राजकारण यापुढे चालणार नाही. येत्या काळात रायगडचा खासदार काँग्रेस पक्षाचा असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष ताकतीने उतरणार असल्याचे राजाभाऊ ठाकूर म्हणाले.