मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरुवार रात्रीपासून जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. पाकिस्तानी सैन्याने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करुन हवाई हल्ला केला होता. मात्र, भारतीय लष्कराने हे सर्व हल्ले परतवून लावत पाकिस्तानमध्ये घुसून शत्रूला नेस्तनाबूत केले होते. भारतीय सैन्यदलाने वायुदल, हवाईदल आणि पायदळ या तिन्ही आघाड्यांवर पाकिस्तानला धूळ चारली आहे. त्यामुळे आता पाकिस्तान पुन्हा एकदा छुप्या पद्धतीने भारतावर हल्ला करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण पाकिस्तानने काही तासांपूर्वी अरबी समुद्रातील गुजराती मच्छिमारांच्या बोटी ताब्यात घेतल्या आहेत. या मच्छिमारांना पाकिस्तानने जिवंत सोडले असले तरी भारतीय बोटी त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा मुंबईवर झालेल्या 26\11 हल्ल्याप्रमाणे समुद्री मार्गाने लपून भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल सतर्क झाले आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी मुंबईतील मच्छिमारांसोबत बैठक आयोजित केली होती. यावेळी मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात जाताना दक्षता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय नौदलाने भारतीय मच्छिमारांना मासेमारीसाठी विशिष्ट मर्यादा घालून देण्यात आली आहे. समुद्रात या मर्यादेपलीकडे आत जाऊ नये, अशी सूचना मच्छिमारांना देण्यात आली आहे. नौदलाने आखून दिलेल्या सीमेबाहेर ‘शूट टू किल’चे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच लवकरच मुंबईतील मच्छिमार बोटींचं सर्वेक्षण करून एका अॅपच्या मदतीने त्यांचा डाटा गोळा केला जाणार असल्याचे समजते. सुरक्षा यंत्रणांकडून मत्स्यव्यवसाय विभागाला कोणत्या सूचना देण्यात आल्या?1) भारतीय नौसेनेकडून समुद्रात ODA (ऑफशोअर डिफेन्स एरिया) या क्षेत्रात मच्छिमारांना मासेमारी करता येणार नाही… ह्या क्षेत्राल बोटी आढळ्यास शूट-टू-किल चे आदेश देण्यात आले आहेत. ऑईल-रिग सारख्या क्षेत्रात मासेमारीला जाऊ नये अथवा वादळा पासून वाचण्याकरिता त्या क्षेत्राचा आश्रय घेऊ नये.2) मत्स्यवयसाय विभागातील LO ह्यांना सहकार्य करावे, कारण देशाची सागरी सुरक्षेची जबाबदारी मच्छिमारांवर सुद्धा असल्याने या कठीण परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांना आणि प्रशासनांना सहकार्य करावे, ही विनंती.