रायगड जिल्ह्यास खेलो इंडीया निवड चाचणीचा प्रथम बहुमान… १ ली खेलो इंडीया बीच गेम्स चाचणीचे अलिबाग बिचवर उद्घाटन…

0
10

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

केंद्र शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे १ ली खेलो इंडीया बीच गेम्स २०२५ च्या निवड चाचणीचे उद्घाटन जे.एस. एम. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सुनिता पाटील यांचे हस्ते व मा.श्री. सुहास व्हनमाने, जटिल्हा क्रीडा अधिकारी पालघर यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबाग बिचवर करण्यात आले.सदर खेलो इंडीया निवड चाचणी दिनांक-१९ ते २५ मे २०२५ या कालावधीत दिव या केंद्रशासीत प्रदेशात निश्चित झाल्या आहे.या स्पर्धा खुल्या गटात होणार आहे. केंद्र शासनाने घोषीत केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, संपक टकरा या खेळांसाठी पात्र ठरलेला आहे. १ ल्या खेलो इंडीया निवड चाचणीचा प्रथम बहुमान रायगड जिल्ह्यास मिळाल्याने त्यांनी शासनाचे आभार मानले, यामुळे रायगड जिल्ह्यात क्रीडा वातावरण निर्मितीसह प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. दिनांक ८ व ९ मे रोजी होणा-या निवड चाचणीतून फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी व सेपक टकरा खेळाचे राज्याचे संघ निवडले जाणार आहेत. या निवड चाचणीसाठी राज्यातून येणाऱ्या २०० खेळाडूंची निवास व्यवस्था जे. एस. एम. कॉलेज ने करुन दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. गौतम पाटील यांचे विशेष आभार मानले.

उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी श्रीमती तपस्वी गोंधळी, तालुका क्रीडा अधिकारी, श्रीमती अंकिता मयेकर श्री. राजेंद्र अतनूर क्रीडा अधिकारी, आकाश डोंगरे, क्रीडा मार्गदर्शक श्री. संदिप गुरव श्री. देवा पाटील, मक्ति तिवारी, प्रफुल्ल पाटील, सुरेंद्र कांबळे, निवड समिती सदस्य व क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते…