अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पारंपरिक घोडागाडी व बैलगाडी शर्यतींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. घोडागाडीच्या दोन गट आणि बैलगाडीच्या तब्बल नऊ गटांमधून शेकडो स्पर्धकांनी आपले काैशल्य आणि ताकद दाखवत शर्यती गाजवल्या. बैलगाडी स्पर्धेत आद्य अमित नाईक यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकाविला. यावर्षी अलिबाग-मुरुड विभागात झालेल्या बैलगाडी शर्यतींमध्ये आद्य अमित नाईक यांच्या गाडीने 14 वेळा नंबर पटकाविला आहे. तर सलग सहा वेळा फायनल मारलेलया आहेत. बैलगाडी शर्यतीच्या नऊ गटांमध्येही चुरशीचा सामना पाहायला मिळाला. ग्रामीण भागातील पारंपरिक खेळ जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शर्यतींना प्रचंड प्रतिसाद लाभला. प्रेक्षकांच्या जयघोषात प्रत्येक गटातील अंतिम फेरी रंगली.
या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे फायनल स्पर्धेत घोडा गाडी शर्यतीत आद्य अमित नाईक यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावत ५५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस तर मानाची गदा मिळवले. त्यांच्या घोड्याच्या वेगाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या पाठोपाठ प्रसन्न सुर्वे यांनी दुसऱ्या क्रमांकाची घोडा गाडी स्पर्धा जिंकून ३३ हजार ३३३ रुपयांचे बक्षीस पटकावले, तर मिलिंद वामन पडवळ यांनी तृतीय क्रमांक पटकावत २२ हजार २२२ रुपयांचे बक्षीस मिळवले. दरम्यान, आद्य अमित नाईक यांच्या बैलगाडीने शर्यत प्रेमींची मने नेहमीच जिंकली आहेत. यावर्षी अलिबाग-मुरुड विभागात झालेल्या बैलगाडी शर्यतींमध्ये 14 वेळा नंबर पटकाविला आहे. तर सलग सहा फायनल मारलेलया मान मिळालेला आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यतींप्रेमींमध्ये आद्य अमित नाईक यांची बैलगाडी आकर्षणाचा विषय ठरत आहे.
स्पर्धेचे निवेदन आणि समालोचन निलेश पाटील व मल्याण यांनी संयत आणि माहितीपूर्ण शैलीत पार पाडले, ज्यामुळे प्रेक्षकांना शर्यतींचा प्रत्येक क्षण अधिक रंगतदार वाटला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि आयोजकांनी विशेष मेहनत घेतली. पारंपरिक खेळांचे संवर्धन आणि ग्रामीण क्रीडासंस्कृतीला चालना देणारी ही स्पर्धा भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात घेण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्पर्धक, प्रेक्षक व आयोजकांचे विशेष आभार मानण्यात आले. या स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील पारंपारिक क्रीडाप्रकारांना नवीन उभारी मिळाल्याचे मत विविध स्तरांवरून व्यक्त होत आहे. या शर्यती भविष्यातही सातत्याने आयोजित करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.