रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव, दीप वायडेकर):-
रोहा तालुक्यातील तांबडी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती..या खटल्याचा माणगाव कोर्टात ८ मे रोजी निकाल लागला.या प्रकरणातील सर्व आरोपीना कोर्टाने निर्दोष ठरविण्यात आले…कोर्टाने दिलेला निर्णय दुर्दैवी असल्याने रोह्यातील शेकडो महिलांसह नागरिकांनी मंगळवार दि. ( १३) मे रोजी कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी राम मारुती चौक ते तहसीलदार असा जन आक्रोश मोर्चा काढला. मोर्चात महिलांनी विविध मागण्यांचे पञ प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांना दिले…आरोपीला फाशी द्या,आम्हाला न्याय द्या अशा घोषणा देत महिलांनी हंबरडा फोडला.या मोर्चात सर्व समाज बाधंव व विविध राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते…दरम्यान हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात आला होता…सरकारी बाजु मांडण्यासाठी एडवोकेट उज्वल निकम यांनी बाजू मांडली होती…परंतु माणगाव कोर्टात निकाल दुर्दैवी व अन्यायकारक लागल्याने संपूर्ण रोह्यात संतापाची लाट पहायला मिळाली…
शेकडो महिलांच्या उपस्थितीत रोहा प्रांत ज्ञानेश्वर खुटवड यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की,या प्रकरणी सक्षम यंत्रणेची नव्याने नियुक्ती करून पिडीतेला न्याय देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात यावा…तर उच्च न्यायालयात प्रकरण चालवण्यासाठी सक्षम सरकारी वकीलाची नियुक्ती करण्यात यावी…या प्रकरणात काही अपुरे पुरावे असल्यास ते पुरावे गोळा करण्यासाठी एसआयटी व अन्य विशेष सक्षम यंत्रणा स्थापन करावी…सदर तपास योग्य करण्यात आला आहे कि नाही यासाठी विशेष कमिटीची स्थापना करण्यात यावी तसेच या तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या विभागाची चौकशी करावी व संबंधित अधिकारी यांच्यावर निलंबाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली…