नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण काम करण्याचा प्रताप अंजप आणि गुधवन फाट्याच्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु आहे…विशेष म्हणजे रस्त्यावर पावसाचे पाणी पडत असताना देखील डांबर टाकण्याचा प्रताप येथे सुरु होता… आमचे प्रतिनिधी या रस्त्यावरून काही कामानिमीत्त जात असताना त्यांच्या ही बाब निदर्शनास आली… आमच्या प्रतिनिधीनी काम करणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या आता पाऊस सुरु झाला आहे… डांबर टाकू नका… मात्र त्यानंतरही काम सुरु होते… बेजबाबदार अधिकारी व निकृष्ट काम करणाऱ्या कामगारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत…सरकारी पैसे जर असेच वाया जात असतील तर यावर अंकुश नेमका कोणाचा ? असा सवाल उपस्थित होत आहे…