मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे ) :-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार “ऑपरेशन सिंदूर” कारवाईच्या पहिल्याच दिवशी भारताच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला दिलेले तगडे संदेश ठोकरल्याचा परिणाम पाकिस्तान देखील आज भोगतो आहे आणि याबद्दल एरव्ही मिडीयावर बारीकसारीक लक्ष ठेवणारे लोक युद्ध सदृष्य वातावरणात बहुदा विसरल्यानेच “युद्धबंदी का केली ?” असे प्रश्न करण्याचे मानस ठेवताना दिसते आहे.
सन २०१६, २०१९ आणि आताचे “ऑपरेशन सिंदूर” ह्या कारवाया “कायनेटिक मिलीटरी ऑपरेशन्स” या प्रकारात मोडतात. म्हणूनच युद्ध, लढाई आणि कायनेटिक मिलीटरी ऑपरेशन्स यातले फरक पडताळून पाहणे आवश्यक आहे.”कायनेटिक मिलीटरी ऑपरेशन्स” ही एखाद्या उद्धिष्टांसाठीच मर्यादित असतात, कोणताही भुभाग ताब्यात घेण्यासाठी नाही तर एक “तगडा संदेश” देण्यासाठी असतात. तो संदेश आपण पहिल्याच दिवशी दिला आणि अतिरेकी कारवाया थांबवण्याची घोषणा केली. मात्र पाकिस्तानने त्यावर उलट हल्ले केले म्हणून आपण दुसऱ्या टप्प्यात अजून हल्ले केले आणि पाकिस्तानी वायुसेनेच्या तळांची वासलात लावून आपण थांबलो.
आपली अर्थव्यवस्था येणाऱ्या दोन वर्षांत जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेली असेल. सध्या आपल्याकडे दोन विमानवाहू युद्धनौका आहेत. भविष्यात आपले जागतिक आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी आपल्याकडे ७ ते १० विमानवाहू युद्धनौका असतील आणि त्या साता-समुद्रात गस्त घालत असतील तेव्हा आपली मिसाईल्स जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात मारा करू शकतील अशी असतील आणि आपण म्हणू तो सेटेलाईट पाडू असे तंत्र आपल्याकडे असेल त्यासाठी आपली जनता अत्यंत प्रबुद्ध आणि जियोपॉलिटीक्स, डिफेन्स, इंटर्नल सिक्युरिटी, इंटेलिजन्स या विषयात किमान ज्ञान तरी बाळगणारी असायला हवी.
राष्ट्र चालवणे म्हणजे इतक्या सोप्या गोष्टी नाहीत.. आपल्याला मूलभूत गोष्टींची कल्पना नाही, त्या माहीत नाही आणि फुकट मिळणाऱ्या डेटासह मजबूत “लोकशाही” असल्याने आपण काही प्रश्न करू शकतो,हा भाग वेगळा..
मात्र भविष्यात प्रत्येक भारतीयाने अत्यंत प्रबुद्ध म्हणजे डिफेन्सीव्ह जियोपॉलिटीकल व इंटर्नल सिक्युरिटी सह इंटेलिजन्स अगदी पंतप्रधान मोदींसारखे कसे व का असावे याचे उत्तर मिळेल आणि “युद्धबंदी का केली ?”हे पुन:श्च आवाहन आहे कारण यासम प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाला यामुळे निश्चित अनुभूती होईल.
राहता राहिले वीर बाजीराव पेशवाचे अजरामर ब्रीदवाक्य.. “बचेंगे तो और लढेंगे, हमारा स्वराज्य नहीं बक्षेंगे !!” बस्स् समाजाचे मानसिक “स्ट्रक्चर” बदलायला हवे.. !!