रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी १५ ते १८ मे २०२५ या कालावधीत रायगड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. या दरम्यान, पूर्वमोसमी पावसाच्या सरी, गडगडाट, वीज चमक, तसेच वादळी वारे (४०–५० किमी/तास) यांचा संभव वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यावश्यक असून, खालील मार्गदर्शक सूचना पालकत्वाने पाळाव्यात:
सावधगिरीचे उपाय:-
इलेक्ट्रॉनिक उपकरणे (टीव्ही, संगणक) यांचे प्लग काढून ठेवा.
वीज चमकत असताना मोबाईल, लँडलाइन फोन वापरणे टाळा.
घरात सुरक्षित राहा; झाडांपासून व विजेच्या खांबांपासून दूर रहा.
मोकळ्या जागेत अडकले असल्यास, गुडघ्यात डोके घालून बसावे, परंतु जमिनीशी संपर्क कमी ठेवावा.
‘दामिनी ॲप’ मोबाईलमध्ये डाउनलोड करून वीज पडण्याच्या सूचना वेळेवर मिळवाव्यात.
वाहन चालवताना सावधगिरी बाळगा; शक्यतो वाहन थांबवून सुरक्षित ठिकाणी थांबा.
नदी, ओढ्याजवळ किंवा सखल भागात जाऊ नका. पूर परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ उंच जागी स्थलांतर करा.
शाळा व पालक यांच्यात संपर्क ठेवा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्या.
महत्वाचे आपत्कालीन संपर्क:
जिल्हा नियंत्रण कक्ष: ८२७५१५२३६३ / (०२१४१) २२२११८
टोल फ्री क्रमांक: १०७७
अधिकृत हवामान माहिती: mausam.imd.gov.in
सूचना:
अफवांवर विश्वास ठेवू नका. केवळ अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवा.
स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सहकार्य करा.
या पूर्वमोसमी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगणे आणि सुरक्षित राहणे आवश्यक आहे..