समीर बामुगडे यांच्या बातमीची प्रशासनाने घेतली दखल… रास्ता रोकोनंतर रोहे-ऊसर मार्गे चणेरे-बिरवाडी रस्त्याचे काम सुरु…

0
14

रोहा शिवसत्ता टाइम्स (समीर बामुगडे):-

चणेरे-बिरवाडी-पांगळोली ऊसर मार्गे रोहे जोडणाऱ्या रखडलेल्या रस्त्याच्या प्रश्नावर अखेर ग्रामस्थांचा संयम सुटला आणि रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. नागरिकांच्या रोजच्या त्रासांमुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी नविन पनवेल ज्येष्ठ नागरिक संघाच्या नेतृत्वाखाली चणेरा नाका येथे रस्त्यावर उतरत प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.

या रस्त्याच्या कामाबाबत समाजसेवक समीर बामुगडे यांनी सातत्याने पाठपुरावा करत सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला होता. त्यांनी प्रसारित केलेल्या बातमीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आणि आंदोलन झाल्यानंतर काही तासांतच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता बागुल साहेब घटनास्थळी दाखल झाले…

बागुल साहेब यांनी आंदोलकांशी चर्चा करून “चणेरे-बिरवाडी-पांगळोली ऊसर मार्गे रोहे हा रस्ता ३१ मे २०२५ पर्यंत वाहतुकीस खुला केला जाईल,” असे स्पष्ट लेखी आश्वासन दिले. हे आश्वासन स्विकारताच आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले.

या आंदोलनानंतर लगेचच १० किलोमीटर अंतराच्या रखडलेल्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. अनेक महिन्यांपासून जे काम थांबले होते, त्याला आता वेग मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनात पावसाळ्यापूर्वी रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे आणि पावसाळ्यानंतर मजबुतीकरणासह डांबरीकरण करणे, असा उल्लेख आहे. त्यामुळे नागरिक आता प्रशासनाच्या कृतीकडे बारकाईने लक्ष ठेवत आहेत.

यात विशेष बाब म्हणजे ‘शिवसत्ता’ चॅनेलने सुद्धा या अन्यायावर वाचा फोडत प्रशासनाच्या भूमिकेवर कठोर प्रश्न उपस्थित केले. शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनेल आणि समीर बामुगडे यांच्या या ठाम वृत्तीमुळे या विषयाला आणखी धार मिळाली.

ज्येष्ठ नागरिक प्रकाश विचारे अरुण कोंडे संजय गोरीवले शंकर दिवकर  पांगळोली ठाकूरवाडी ग्रामस्थ पराग घाग,भाऊ आखले,मनोज तांडेल,समीर वारगुडे   बबन पडवळ,महादेव जाधव.. राजेंद्र पाटील,मोरे गुरुजी केशव भस्मा, सखाराम भस्मा इत्यादी ग्रामस्थ या रस्ता रोको मोर्चा उपस्थित होते..

समीर बामुगडे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या एकजुटीमुळेच प्रशासन हलले असल्याचे बोलले जात आहे. हे यश केवळ आंदोलनाचे नसून जनतेच्या आवाजाला मिळालेला प्रशासनाचा प्रतिसाद आहे.