मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते वाळसूरे येथील गांधारी नदीवरील नवीन बांधलेल्या पुलाचे उद्घाटन…

0
13

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-

महाड तालुक्यातील रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक वाळुसरे गावांमधील गांधारी नदीवर नवीन बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन माननीय नामदार भरत शेठ गोगावले फलोत्पादन व खारभूमी मंत्री यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून आणि फीत कापून करण्यात आले, यावेळी त्यांच्या समवेत शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विजय सावंत, जिल्हा समन्वयक राजूशेठ देशमुख, उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडिक,महाड तालुकाप्रमुख बंधू तरडे,`मिलिंद देशमुख, धीरज पाटील, दिलीप पारटे, गोपाळ शेठ, वाळसुरेच्या उपसरपंच प्रमिला जैतपाळ, रिटायर मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता जैतपाल, उद्योजक प्रदीप जैतपाळ आदी मान्यवर उपस्थित होते आमदार निधीतून 65 लाख रुपये खर्च करून भव्य अशा दिमागदार मोठ्या पुलाचे उद्घाटन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या शुभहस्ते करून या पुलाचे “रामसेतू पूल “असे नामांतर करण्यात आले मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांचा यथोचित सत्कार ग्रामस्थांच्या वतीने उद्योजक प्रदीप जैतपाल यांच्या हस्ते करण्यात आला तसेच कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचाही सत्कार ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला. मंत्री भरत शेट गोगावले यांच्या हस्ते रिटायर मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता जैत पाल यांचा शाल श्रीफळ आणि मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी वाळसुरे गावठाण, बौद्धवाडी ,नगरभूवन येथील महिला आणि ग्रामस्थ तसेच सो मजाई मित्र मंडळ वाळसुरेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राजेंद्र जैतपाळ यांनी केले तर आभार संतोष गांगण यांनी मानले.