शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नारायण नागू पाटील यांनी लढा दिला.हा लढा देशातील एक ऐतिहासिक लढा ठरला:जयंत पाटील…

0
16

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नारायण नागू पाटील यांनी लढा दिला. हा लढा देशातील एक ऐतिहासिक लढा ठरला.त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील भैरवनाथ युवक मंडळ पटांगणात आयोजित जिल्हा पक्ष संघटना आणि विविध जन आघाड्यांचा पदाधिकारी निवड मेळाव्यात केले.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी जयंत पाटील यांनी सांगितले की,एका सामान्य कुटूंबातील शेतकऱ्यांचा मुलगा काय करू शकतो, हे नारायण नागू पाटील यांनी त्यावेळी आपल्या आंदोलनातून व लढ्यातून दाखवून दिले आहे… या भूमीला एक वेगळा इतिहास आहे. त्यांच्या लढ्याची प्रेरणा घेऊनच पेझारीमध्ये पक्षाचा मेळावा घेतला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नारायण नागू पाटील यांनी लढा दिला. हा लढा देशातील एक ऐतिहासिक लढा ठरला. त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. शेतकरी कामगार पक्षाला सोडून जाणे काही नवीन नाही. यापुर्वीदेखील अनेकजण पक्षाला सोडून गेले आहेत. परंतु, पक्ष कधीच संपला नाही. वेगळ्या उमेदीने कार्यकर्त्यांनी काम करून पुन्हा पक्षाला बळ दिले आहे. महात्मा ज्योतीबा फुले यांचा विचार घेऊन आपण काम करीत आहोत. दबलेल्या वर्गाला, पिडीत व्यक्तीला पुढे नेण्याचे काम महात्मा फुलेंनी केले. विशिष्ट समाजाची मक्तेदारी पूसून काढून त्यांनी बहूजनांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि शेतकरी कामगार पक्षाचे एक वेगळे नाते आहे.ज्यांना तयार केले. अनेक पदे दिली, ते निघून गेले. मात्र, एक वेगळ्या चिडीने आणि उमेदीने कार्यकर्त्यांनी कामाला लागून आगामी काळात काम करायचे आहे.

उद्याच्या निवडणुकीत आपलाच लाल बावटा फडकणार आहे, असा विश्वास आहे. तरुणांचा जनआघाडीमध्ये समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळ्या तऱ्हची भूमिका घेऊन काम करायचे आहे. कामगारांनी रक्त सांडून कायदे केले. तेच कायदे पूसण्याचे काम हे सरकार करीत आहे. मोर्चे काढणे, आंदोलन करण्याचा अधिकारही नसणार आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे. तसेच, पक्ष बदलणाऱ्यांना उभे करायचे नाही. त्यांना निवडणुकीचे तिकीटही द्यायचे नाही. सध्या देशासह राज्याची परिस्थिती भयावह आहे. पीक विमा बंद आहे. लाडकी बहीण लाडकी राहिली नाही. त्यामुळे जनतेचे प्रश्न समोर ठेवून लढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन त्यांनी केले आहे.आता गौतम पाटील यांच्या रुपाने चौथी नवीन पिढी तयार झाली आहे. दि. बा. पाटील यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला आहे.शेतकरी कामगार पक्षाच्या लढ्यामुळे अनेकांना न्याय मिळाला आहे. जिल्ह्यात चौथी मुंबई येत आहे. भूमीपुत्रांना न्याय मिळावा, यासाठी शेकाप शेतकरी, भूमीपुत्रांच्या पाठीशी कायम राहिल, पेझारीच्या भूमीत अनेक लढे, आंदोलने झाली आहेत. या भूमीतून स्फूर्ती घेऊन वेगळ्या त-हेने काम करायचे आहे. प्रतिगामी शक्ती वाढत असेल तर खारेपाट खपवून घेणार नाही. सत्ता असो, अथवा नसो; परंतु, निष्ठावंतांची फळी निर्माण करून आगामी काळात जिल्ह्यात विजय खेचून आणण्याचे काम प्रत्येकाला करायचे आहे. आजचा मेळावा हा उद्याला कलाटणी देणारा आहे. त्यामुळे उद्याची पहाट ही आपलीच असणार, असा विश्वास शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले की,पेझारी ही क्रांती भूमी आहे. त्याच भूमीतून प्रेरणा घेऊन प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोशाने काम करायचे आहे. उद्याचा कालखंड हा संधीचे सोने करण्याचा असणारा आहे. कार्यकर्ते पेटून उठले आहेत. जनतेच्या हितासाठी काम करण्याचा वसा पुढे न्यायचा आहे. जिल्ह्यात अनेक अडचणी, समस्या आहेत. ज्यांना निवडून दिले ते मशगूल आहेत. नैनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमीनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबई उर्जा टॉवर उभारले जात आहे. शेतकऱ्यांच्या जमीनी जात आहेत.सत्तेतील आमदारांकडे या प्रश्नाबाबत शेतकरी गेले. त्यावेळी आमदारांनी केंद्राचा प्रकल्प आहे, आपण काही करू शकत नाही, असे सांगून जबाबदारी झटकली. जनतेच्या प्रश्नांना न्याय देणे हे आपले व्रत आहे.आपल्या पक्षाची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे.त्यासाठी स्वस्थ बसून चालणार नाही.आगामी काळ निवडणुकांचा असणार आहे. निवडणुका जिंकायच्या देखील आहेत.निवडणुकीत पराभव झाला तरी चालेल मात्र त्या पराभवातून खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा तयार झालो पाहिजे.

पक्षाच्या प्रदेश महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे यांनी संबोधित करताना सांगितले की,खारेपाटाने ठरवले मेळावा होईल, तर नाना पाटील यांच्या युद्धभूमीवरुनच होईल. आणि, खऱ्या अर्थाने युद्धाला आजपासून सुरुवात झाली आहे. सरदार निवडले गेलेले आहेत. पक्षात महिलांच्या खांद्यावर जबाबदारी देण्याचे काम भाईंच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांनो, कमरेला पदर खोचून कामाला लागा,जोपर्यंत लाल बावटा दिमाखात डोलणार नाही. शपथ घेतो, तोपर्यंत झोपणार नाही. रात्र वैऱ्याची आहे. विजय नेतृत्वाच्या पायाजवळ आला पाहिजे. पदाला न्याय द्यायचा आहे. हरवलेले वैभव पुन्हा साध्य करायचे आहे. जयंत पाटील यांनी दिलेली जबाबदारी, दाखविलेला विश्वास साध्य करायचा असेल, तर नेटाने काम करावे लागेल. महिला कार्यकर्त्यांनी पुरुष कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करुन सिद्ध करावे लागेल, तळागाळातील लोकांवर अन्याय होतोय, त्याविरोधात आवाज उठवावा लागेल.

जिल्हा आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की,शेतकरी कामगार पक्षाचा सुवर्ण इतिहास होता. तो पुन्हा मिळवून देण्याची जबाबदारी आपली असून,त्यासाठी त्वेषाने, चिडीने काम करायचे आहे,आपल्यासमोरची माणसे काही ठिक नाहीत. तालुक्याचे विद्यमान आमदारांचे कर्मचारी दरोडेखोर,  विनयभंगाच्या केसमध्ये अडकलेला आहे.आमदारांकडून पत्रकारांचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलीस यंत्रणेला सांगायचे आहे, की तुम्ही सिंघम आहात. तुम्ही घाबरु नका. तुम्ही कायद्यात खरे आहे तेच करा आणि गोरगरीबांच्या पाठीशी उभे राहा. पक्षासाठी चीड, पक्षासाठी प्रेम असणारे निष्ठावान कार्यकर्ते आज याठिकाणी उपस्थित आहेत. आज पक्ष नव्या दमाने, नव्या उमेदीने उभा राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, शेतकरी कामगार पक्षासाठी हा मेळावा फार महत्त्वाचा आहे. जुन्या-नव्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सांगड घालून ज्यांची ज्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्याचा मला आनंद आहे. त्यामुळे आता जुन्या-नव्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे.असेही त्या म्हणाल्या.

यावेळी शेकाप ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, माजी आ. बाळाराम पाटील, प्रा. एस.व्ही. जाधव, अॅड. राजेंद्र कोरडे, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, शेकाप राज्य खजिनदार अतुल म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नृपाल पाटील, अॅड. गौतम पाटील, नारायण पाटील, काशिनाथ पाटील, राजेंद्र पाटील, अस्लम राऊत, विजय गिदी, नीता गिदी, अलिबाग तालुका शेकाप चिटणीस अनिल पाटील, जिल्ह्यातील चिटणीस मंडळाचे, तालुका चिटणीस मंडळाचे तसेच वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, सदस्य, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समिती, मच्छीमार सहकारी सोसायटीचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य अशा सर्वच क्षेत्रातील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिव कार्यकर्ते, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.