अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
लाडकी बहीण योजना फसवी आहे त्यासाठी बजेट मध्ये तरतूद करणे अपेक्षित होते. ती केलेली नाही. सरकार खोटं बोलत असल्याची टीका शेकाप नेते जयंत पाटील यांनी केली आहे. पेझारी इथं शेकापचा मेळावा पार पडला त्यानंतर ते बोलत होते. सरकारने निवडुकीत कर्जमाफीची घोषणा केली तीदेखील दिली नाही. याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा जयंत पाटील यांनी दिलाय.